शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात रंगू लागले साखर कारखान्यांचे राजकारण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स हा साखर कारखाना बेकायदेशीरपणे सुरु असल्याने या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली असता शिरुर तालुक्यातील अनेक शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या व्यंकटेशकृपा कारखान्याबाबत राजकारण कोणी करु नये तसेच कारखाना आम्ही बंद पडू देणार नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स या कारखान्यावर बेकायदेशीर असल्याचा आरोप केले जात असताना आज शिरुर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत पत्रकार परिषद घेतली, यावेळी पिंपळे जगतापचे माजी सरपंच शिवाजी जगताप, निलेश जगताप, जातेगाव बुद्रुकचे माजी सरपंच सुरेश इंगवले, नवनाथ शिवले, संभाजी धुमाळ, गणेश शेळके, शिवाजी भोंडवे, आण्णासाहेब मांजरे, हनुमंत पवार, नानासाहेब इंगवले, अंकुश उमाप, सोमाजी क्षिरसागर, राजेंद्र गव्हाणे, साहेबराव भंडारे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना कारखान्याचा त्रास शेजारील लोकांना होत नसून लांब राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कसा होत आहे, कारखान्यातून प्रक्रिया केल्या जाणाऱ्या पाण्याचा आम्हाला शेतीला फायदा होत आहे, तर एका शेतकऱ्याने जातेगाव बुद्रुकचे नाव कोठेही नसताना कारखान्यामुळे आज जातेगाव बुद्रुकचे नाव जगाच्या नकाशावर गेले असल्याचे सांगितले.

यापूर्वी विरोधकांचा घोडगंगा कारखान्यावर डोळा होता त्यात काही साध्य झाले नाही म्हणून आता शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या व्यंकटेशकृपा च्या मागे लागून घोडगंगेचा राग इकडे काढला जात आहे, मात्र शेतकरी हा कारखाना बंद पडू देणार नाही. कारखान्यावर आरोपी करणाऱ्यांचा ऊस आहे का असा देखील सवाल काही शेतकऱ्यांनी केला असून त्यांनी एखादा कारखाना अथवा संस्था काढून ती संस्था चालवून दाखवावी असा देखील इशारा यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी विरोधकांना दिला आहे.

यापूर्वी आपल्या राज्यातील उद्योग बाहेर नेण्याचे काम भाजपाने केलेले असून त्याच धर्तीवर भाजपाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला साखर कारखाना बंद करण्याच्या मागे लागल्याचा आरोप नवनाथ शिवले यांनी केला आहे.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीनंतर शिरुर तालुक्यात कारखान्यावरील राजकारण थंड होईल असे वाटत असताना आता पुन्हा व्यंकटेश कृपा कारखान्यामुळे शिरुर तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटत राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

16 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

16 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

16 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

17 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

17 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

17 तास ago