शिरूर तालुका

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी ग्रामसुरक्षा यंत्रणा बसवण्यात आलेली होती. त्या ग्राम सुरक्षा यंत्रणे मुळे गावात काही दुर्घटना घडल्यास तसेच अपघात घडल्यास गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर एकाच वेळी फोन जात असल्याने तातडीची मदत मिळत होती. अनेकदा गावामध्ये लागलेल्या आगी, रात्रीच्या वेळी आलेले चोरटे, शेतकऱ्यांना दिसलेले बिबटे याबाबत वेळीच मदत मिळून अनेक दुर्घटना देखील टळल्या गेलेल्या आहेत. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे दिड वर्षापासून सदर यंत्रणा बंद पडलेली होती. त्यामुळे सदर यंत्रणा सुरु करण्याची मागणी महारुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राघू नप्ते यांनी ग्रामपंचायतकडे मार्च २०२२ मध्ये केलेली होती.

परंतु ग्रामपंचायत प्रशासन काही केल्या सदर यंत्रणा चालू करुन घेत नसल्याने अखेर करंदीच्या महिला पोलीस पाटील वंदना महेश साबळे यांनी स्वखर्चाने नागरिकांच्या सोयीसाठी सदर यंत्रणा सुरु करुन दिली असल्याने महिला पोलीस पाटलांचे गावातून कौतुक होत आहे तर गावामध्ये सार्वजनिक कामांमध्ये हजारोंची वर्गणी देत आम्ही खूप भारी असे दाखवणारे स्थानिक पुढारी गावाच्या हिताच्या कामातून कोठे गायब झाले असा देखील प्रशन गावातील नागरिकांना पडला आहे.

करंदी गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणा मागील बॉडीच्या काळात बसवण्यात आलेली असून अनेक महिन्यांपासून बंद पडलेली होती. याबाबत सदर यंत्रणा सुरु करण्याबाबत गावातील राघू नप्ते यांनी अर्ज दिला. परंतु सध्याच्या ग्रामपंचायत बॉडीच्या काही शंका असल्याने यंत्रणा देणाऱ्या लोकांसोबत मिटिंग लावा असे बोलत होते. त्यामुळे त्यांच्याकडून यंत्रणा सुरु करण्याबाबत प्रतिसाद येत नव्हता, असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

7 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

7 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

12 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

12 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

12 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

12 तास ago