शिरूर तालुका

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी ग्रामसुरक्षा यंत्रणा बसवण्यात आलेली होती. त्या ग्राम सुरक्षा यंत्रणे मुळे गावात काही दुर्घटना घडल्यास तसेच अपघात घडल्यास गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर एकाच वेळी फोन जात असल्याने तातडीची मदत मिळत होती. अनेकदा गावामध्ये लागलेल्या आगी, रात्रीच्या वेळी आलेले चोरटे, शेतकऱ्यांना दिसलेले बिबटे याबाबत वेळीच मदत मिळून अनेक दुर्घटना देखील टळल्या गेलेल्या आहेत. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे दिड वर्षापासून सदर यंत्रणा बंद पडलेली होती. त्यामुळे सदर यंत्रणा सुरु करण्याची मागणी महारुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राघू नप्ते यांनी ग्रामपंचायतकडे मार्च २०२२ मध्ये केलेली होती.

परंतु ग्रामपंचायत प्रशासन काही केल्या सदर यंत्रणा चालू करुन घेत नसल्याने अखेर करंदीच्या महिला पोलीस पाटील वंदना महेश साबळे यांनी स्वखर्चाने नागरिकांच्या सोयीसाठी सदर यंत्रणा सुरु करुन दिली असल्याने महिला पोलीस पाटलांचे गावातून कौतुक होत आहे तर गावामध्ये सार्वजनिक कामांमध्ये हजारोंची वर्गणी देत आम्ही खूप भारी असे दाखवणारे स्थानिक पुढारी गावाच्या हिताच्या कामातून कोठे गायब झाले असा देखील प्रशन गावातील नागरिकांना पडला आहे.

करंदी गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणा मागील बॉडीच्या काळात बसवण्यात आलेली असून अनेक महिन्यांपासून बंद पडलेली होती. याबाबत सदर यंत्रणा सुरु करण्याबाबत गावातील राघू नप्ते यांनी अर्ज दिला. परंतु सध्याच्या ग्रामपंचायत बॉडीच्या काही शंका असल्याने यंत्रणा देणाऱ्या लोकांसोबत मिटिंग लावा असे बोलत होते. त्यामुळे त्यांच्याकडून यंत्रणा सुरु करण्याबाबत प्रतिसाद येत नव्हता, असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

4 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

4 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

4 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

4 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

4 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

4 तास ago