शिरूर तालुका

शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

या बैठकीत शिरूर तालुक्याचे कृषी अधिकारी सुवर्णा आदक व हवेली तालुक्याचे एम. डी. साळे यांनी खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. याशिवाय, खत व बियाणे याबाबत पंचायत समिती शिरूरचे कृषी अधिकारी दिनेश आडसुळ आणि हवेलीचे कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर यांनी सविस्तर माहिती दिली.

शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांनी पिकांना हमीभाव मिळावा अशी मागणी शासनाकडे केली, तर गणेगावचे सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी कांदा चाळ अनुदान वाढीबाबत सूचना मांडल्या.

आमदार माऊली कटके यांनी यावेळी कृषी विभाग व पंचायत समित्यांना खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर सेवा आणि सुविधा देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात केळी व आंबा लागवड क्षेत्रात वाढ करून निर्यातक्षम उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कांदा चाळ अनुदान वाढविण्यात आले असून आता २५ टन क्षमतेच्या चाळीस एका टनाला ५००० रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभार्थींना – आंबळे येथील सीमा बेंद्रे आणि शिक्रापूर येथील नंदाताई भुजबळ – यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय बाजरी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ताराबाई बांदल यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, रामभाऊ कदम, गावचे सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री संघाचे संचालक, महावितरण अधिकारी, पीडीसीसी बँक अधिकारी आणि कृषी विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

20 मिनिटे ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

24 मिनिटे ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

26 मिनिटे ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

29 मिनिटे ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

3 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

4 तास ago