शिरूर तालुका

शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

या बैठकीत शिरूर तालुक्याचे कृषी अधिकारी सुवर्णा आदक व हवेली तालुक्याचे एम. डी. साळे यांनी खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. याशिवाय, खत व बियाणे याबाबत पंचायत समिती शिरूरचे कृषी अधिकारी दिनेश आडसुळ आणि हवेलीचे कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर यांनी सविस्तर माहिती दिली.

शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांनी पिकांना हमीभाव मिळावा अशी मागणी शासनाकडे केली, तर गणेगावचे सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी कांदा चाळ अनुदान वाढीबाबत सूचना मांडल्या.

आमदार माऊली कटके यांनी यावेळी कृषी विभाग व पंचायत समित्यांना खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर सेवा आणि सुविधा देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात केळी व आंबा लागवड क्षेत्रात वाढ करून निर्यातक्षम उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कांदा चाळ अनुदान वाढविण्यात आले असून आता २५ टन क्षमतेच्या चाळीस एका टनाला ५००० रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभार्थींना – आंबळे येथील सीमा बेंद्रे आणि शिक्रापूर येथील नंदाताई भुजबळ – यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय बाजरी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ताराबाई बांदल यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, रामभाऊ कदम, गावचे सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री संघाचे संचालक, महावितरण अधिकारी, पीडीसीसी बँक अधिकारी आणि कृषी विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago