शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यात अनेक ठिकाणी दोन समाजामध्ये वादविवाद घडुन दोन्ही समाजामध्ये कटुता निर्माण होत आहे. मात्र याला अपवाद आहे शिरुर शहर… गेल्या अनेक वर्षाचा भाईचारा जपत येथील खिदमत फॉउडेशनने गेल्या 4 वर्षापासुन सर्व समाजाच्या उत्सवात एक होत कोरोना काळापासुन विविध उपक्रम हाती घेतल्याने त्यांना नुकताच भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
शिरुर शहरातील हाजी आसीफ शेख ,हाजी फारुख बागवान, हाजी मुश्ताक शेख, हाजी फिरोज बागवान, आबिद शेख, फारुख सांगलीकर यांनी मिळुन हे खिदमत फाउडेशन सुरु केले. याबाबत या फाउडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख यांनी सांगितले कि समाजातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेउन हे खिदमत फाउंडेशन काम करत असुन कोरोना काळात खऱ्या अर्थाने गरजुना अन्नधान्याचे किट वाटप करुन आरोग्य शिबीर तसेच दर वर्षी ८० गरजु कुटुंबाना एक महिन्याला पुरेल एवढा अन्नधान्य किट वाटप कोरोना काळापासुन सुरु केले असुन तसेच 3 वर्ष रमजान ईद निमित्त २०० जणाना किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. तसेच आरोग्य शिबीर घेत चाळीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदु ऑपरेशन करण्यात आले.
शिवजयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान पाणी वाटपही करण्यात आले. नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिरुर शहरात फ्रुट चे वाटप करण्यात आल्याचे शेख यांनी सांगत कोरोना काळापासुन फाउंडेशनने रुग्णासाठी बेड, व्हील चेअर, ऑक्सीजन तसेच इतर आरोग्य सेवा मोफत पुरवत असल्याचे शेख यांनी सांगितले.
शासकिय मतिमंद शाळेत २१ अनाथ मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले हे सर्व गोष्टी करत असताना समाजातील अनेक दानशुर व्यक्तीनी तसेच डॉक्टर, हॉस्पीटल, सामाजीक संस्था यांनी मदत केले असल्याचे शेख यांनी सांगितले.
शिरुर शहरातील मुस्लीम युवक एकत्र येउन चांगले काम करु शकतात हे खिदमत फाउंडेशनने दाखवुन दिले आहे. त्यांच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…