शिरूर तालुका

खिदमत फाऊंडेशन भीमरत्न पुरस्कार सन्मानित

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यात अनेक ठिकाणी दोन समाजामध्ये वादविवाद घडुन दोन्ही समाजामध्ये कटुता निर्माण होत आहे. मात्र याला अपवाद आहे शिरुर शहर… गेल्या अनेक वर्षाचा भाईचारा जपत येथील खिदमत फॉउडेशनने गेल्या 4 वर्षापासुन सर्व समाजाच्या उत्सवात एक होत कोरोना काळापासुन विविध उपक्रम हाती घेतल्याने त्यांना नुकताच भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

शिरुर शहरातील हाजी आसीफ शेख ,हाजी फारुख बागवान, हाजी मुश्ताक शेख, हाजी फिरोज बागवान, आबिद शेख, फारुख सांगलीकर यांनी मिळुन हे खिदमत फाउडेशन सुरु केले. याबाबत या फाउडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख यांनी सांगितले कि समाजातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेउन हे खिदमत फाउंडेशन काम करत असुन कोरोना काळात खऱ्या अर्थाने गरजुना अन्नधान्याचे किट वाटप करुन आरोग्य शिबीर तसेच दर वर्षी ८० गरजु कुटुंबाना एक महिन्याला पुरेल एवढा अन्नधान्य किट वाटप कोरोना काळापासुन सुरु केले असुन तसेच 3 वर्ष रमजान ईद निमित्त २०० जणाना किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. तसेच आरोग्य शिबीर घेत चाळीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदु ऑपरेशन करण्यात आले.

शिवजयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान पाणी वाटपही करण्यात आले. नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिरुर शहरात फ्रुट चे वाटप करण्यात आल्याचे शेख यांनी सांगत कोरोना काळापासुन फाउंडेशनने रुग्णासाठी बेड, व्हील चेअर, ऑक्सीजन तसेच इतर आरोग्य सेवा मोफत पुरवत असल्याचे शेख यांनी सांगितले.

शासकिय मतिमंद शाळेत २१ अनाथ मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले हे सर्व गोष्टी करत असताना समाजातील अनेक दानशुर व्यक्तीनी तसेच डॉक्टर, हॉस्पीटल, सामाजीक संस्था यांनी मदत केले असल्याचे शेख यांनी सांगितले.

शिरुर शहरातील मुस्लीम युवक एकत्र येउन चांगले काम करु शकतात हे खिदमत फाउंडेशनने दाखवुन दिले आहे. त्यांच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

4 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

4 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

4 तास ago