शिरूर तालुका

महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून कायदा करावा; डॉ. अमोल कोल्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले जात असून अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला जात असल्याने महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे.

महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केले जात असल्याने शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून संसदेने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी केली. मात्र यावेळी काही वेळेत माईक बंद करत संसदीय कामकाज काही काळ बंद करण्यात आले.

त्यावेळी याबाबत बोलताना संसदेच्या अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात वारंवार अवमान जनक वक्तव्य होत आहेत. त्या संदर्भात ठोस कायद्याची तरतूद व्हावी जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमान जनक वक्तव्य करण्याची कोणाचीही हिम्मत होऊ नये, यासाठी वेळ मागितला होता तो वेळ देण्यात देखील आला. मात्र सुरुवात झाल्या बरोबर अवघ्या दोन वाक्यांमध्ये माईक बंद करण्यात आला.

परंतु माईक बंद केला तरी शिव भक्त्यांच्या भावना व त्या भावनांचा आवाज बंद करता येणार नाही तो आवाज कानठळ्या बसवल्या शिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कोणाचीही छाती होऊ नये, कोणत्याची संविधानक पदावर असेल, कोणत्याची जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची छाती होऊ नये, यासाठी संसदेने कायद्यात ठोस तरतूद करावी सगळ्याच महापुरुषांच्या बाबत हा कायदा करण्यात यावा, अशी माझी मागणी असल्याचे देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

4 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago