शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या…

मच्छीमार समाज आणि युवक वर्गाची एकमुखी मागणी 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते विजय रामचंद्र डिंबर यांना आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ व विशेषतः मच्छीमार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

विजय डिंबर यांनी NSUI पासून राजकीय वाटचालीला सुरुवात करत युवक काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पुढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील विभागीय अध्यक्षपद भुषवले. त्यांची नेतृत्वशैली आणि संघटन क्षमता यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. तसेच त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जवळचे संबंध असून, पक्षाच्या धोरणात्मक पातळीवरही त्यांचा ठसा आहे.

उद्योजक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान

शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांनी व्यवसायिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांनी अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

मच्छीमार समाजासाठी विशेष योगदान 

मच्छीमार समाजाच्या हितासाठी त्यांनी जलसंपत्ती रक्षण, मत्स्य व्यवसायातील अडचणींचे निराकरण, तसेच शासकीय योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत. युवकांसाठी रोजगार मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, तसेच सामाजिक उपक्रम यांद्वारे त्यांनी समाजाशी आपले दृढ नाते टिकवले आहे.

जनतेचा दृढ विश्वास डिंबर हेच योग्य उमेदवार…

विजय डिंबर यांच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक कार्याचा विचार करता पंचायत समिती सदस्यपदासाठी ते योग्य उमेदवार ठरतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी देणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

25 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

29 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

34 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

41 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago