शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावातुन एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ४५०० किलो वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डाळिंबाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी शिंदोडी येथील शेतकरी शहाजी तुकाराम वाळुंज (वय ५०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०२ जुलै २०२५ दरम्यान शिंदोडी येथील गट नंबर १३ मधील अडीच एकर डाळिंब बागेतील अंदाजे ७५० झाडांवरील ४५०० किलो माल अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेला. या डाळिंब फळांची जात भगवा असून फळे लाल रंगाची, गोलसर आकाराची होती.
या मालाचा प्रति किलो दर १०० रुपये प्रमाणे, एकूण अंदाजे ४ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार टेंगले हे करत आहेत. शिरुर तालुक्यातील डाळिंब चोरीची हि तिसरी घटना असुन शेतकऱ्यांचे त्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…