शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावातुन एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ४५०० किलो वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डाळिंबाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी शिंदोडी येथील शेतकरी शहाजी तुकाराम वाळुंज (वय ५०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०२ जुलै २०२५ दरम्यान शिंदोडी येथील गट नंबर १३ मधील अडीच एकर डाळिंब बागेतील अंदाजे ७५० झाडांवरील ४५०० किलो माल अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेला. या डाळिंब फळांची जात भगवा असून फळे लाल रंगाची, गोलसर आकाराची होती.
या मालाचा प्रति किलो दर १०० रुपये प्रमाणे, एकूण अंदाजे ४ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार टेंगले हे करत आहेत. शिरुर तालुक्यातील डाळिंब चोरीची हि तिसरी घटना असुन शेतकऱ्यांचे त्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…