रांजणगाव गणपती (तेजस फडके) राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी व दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शिरुर प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने दि २४ जुलै २०२५ रोजी कारेगाव येथील यश इन चौकात पुणे-नगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल वाळके यांनी केले. यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. आंदोलकांनी तहसीलदार येईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. मात्र, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांशी चर्चा केली व निवेदन स्विकारले. तसेच सदर मागण्या शासन स्तरावर पाठवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा महिलाध्यक्ष अनिता कदम, महिला जिल्हा उपाध्यक्ष उज्वला गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, पुणे जिल्हा संघटक भास्कर गवारे, शिरुर तालुकाध्यक्ष नारायण नवले, महिला तालुकाध्यक्ष ज्योती हिवरे, माया फलके, संभाजी नवले, मनेश सोनवणे, दत्तात्रय तरटे, यांच्यासह शेकडो दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार सहभागी झाले होते. अंदाजे ८० ते १०० कार्यकर्ते उपस्थित होते.
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने आंदोलन शांततेत पार पडले. या आंदोलनानंतर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. यावेळी शिरुर आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल
शिरुरमध्ये पावामध्ये घुशीची लेंडी आढळल्याचे प्रकरण: अन्न सुरक्षा विभागाने पाहणी करत केली बेकरी सील
Video; शिरुर डेपोमध्ये एसटी चालक व कंडक्टरला मारहाण; गुन्हा दाखल
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…