रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेले आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे कारेगाव येथील मुख्य चौकात गटार लाईन नसल्याने पाणी साठत आहे. पुणे-नगर महामार्गाला मोठया प्रमाणात खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यात हि समस्या निर्माण होत असल्याने रोडच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटवून या ठिकाणी गटार लाईन करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.
कारेगाव येथील मुख्य चौकात पुणे-नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी व्यवसायासाठी गाळे भाड्याने घेतल्याने रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करण्यासाठी मुरुम टाकल्याने दोन्ही बाजूला रोडलगत असणाऱ्या चाऱ्या बुजल्याने पाऊसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन दुचाकी वाहनचालकांना प्रवास करताना पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अतिक्रमणाचा विळखा सुटणार का…?
पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या सर्वच गावात रस्त्याच्या कडेला स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणात जागा बळकावून त्याठिकाणी व्यावसायिक लोकांना त्या जागा भाड्याने दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या केलेल्या असतात. जागा शासनाची मात्र भाडं मात्र हि मंडळी “वसूल” करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ खायला येणारे ग्राहक त्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेलाच पार्क करतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कारेगाव, सरदवाडी या ठिकाणी वाहतुक कोंडी हि नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…