शिरूर तालुका

मानव विकास परीषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी संगिता रोकडे यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता नामदेव रोकडे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे.

मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असुन सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाजातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय आधिकाराचा गैरवापर करत शोषित आणि श्रमिक तसेच मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात होणारी पिळवणुक, मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबत समाज्यातील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी मानव विकास परीषद हि संस्था काम करत आहे.

unique international school

मानव विकास परीषदेचे संस्थापक, अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, प्रदेश सचिव डॉ सचिन सूर्यवंशी, प्रदेश कार्याध्यक्ष असलम सय्यद, युवा प्रदेशाध्यक्ष अंकुर कदम, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा जयश्री अहिरे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख अन्सार शेख, संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास परीषदेच्या माध्यमातून शिरुर तालुक्यात तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संगिता रोकडे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

49 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

3 तास ago