शिरूर तालुका

रेशनिंग! शिरूर तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली…

शिरूर (संपत कारकूड) : रेशन वाटपासाठी वापरल्या जाण्याऱ्या वितरण प्रणालीचा सर्वर २० तारखेपासून डाऊन झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील सर्वच धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. नागरिकांना चालू महिण्याच्या शिधा अद्याप मिळालेला नाही.

शिरूर तालुकाभर प्रत्येक महिन्याची वाटपासाठी दुकानदारांकडून आपापल्या सोईने तालुका पुरवठा विभागाकडून धान्य उचल होत असते. तसेच उचल धान्य वाटपही आपल्या सोईने केले जाते. ज्यांनी लवकर धान्य आणले आणि लगेच वाटप चालू केले त्या ठिकाणी मात्र धान्य मिळाले आहे. परंतु, धान्य महिन्याच्या शेवटच्या तारखेला वाटप करू आशा दुकानदारांचा मात्र आधीच उल्लास आणि त्यात फाल्गुन मास, अशी अवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यात पूर आला होता. त्या काळात गोरगरीबांच्या हाताला कोणतेही काम नाही. नदीला आलेल्या पुरामुळे कांही गावात पाणी शिरलेले होते. अनेक कुटुंबाना या पावसाचा व पुराचा फटका बसलेले असताना याच महिन्यात स्वस्त धान्य वाटपातील या अडचणीला सामोरे जाण्याची वेळ लाभार्थी यांच्यावर आली आहे. या परस्तिथीत या महिन्याकरिता तरी ऑफ लाईन धान्य वाटपासाठी मागणी होत आहे. ती मागणी पूर्ण होणार का? नागरिकांना वाटप उशीर मिळणार? हे पाहावे लागणार आहे.

आम्ही काही करू शकत नाही : सतीश पंचरास
महिना संपला तरी धान्य वाटप का नाही? असा प्रश्न आमच्या प्रतिनिधीने शिरूरचा पुरवठा अधिकार पंचरास यांना केला असता, आम्ही या मध्ये काय करू शकत नाही. वाटप ऑफ लाईन करणे हा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतात. वाटप तात्काळ करण्यासाठी शिरूर पुरवठा वेट अँड वॉच ची भूमिका घेत असून नागरिकांना धान्य केव्हा मिळणार हे त्यांनाही सांगता आले नाही.

शिरुर तहसिलकडून नवीन रेशनकार्डसाठी नागरीक वेठीस; रेशनिंगच्या धान्याचाही होतोय काळाबाजार

शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…

शिरुर तालुक्यात दिव्यांगाना रेशनच धान्य मिळेना, मनमानी कारभार सुरु…

शिरूर तालुक्यात महिना संपला तरी रेशन धान्य वाटप नाही; भ्रष्टाचार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

9 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

9 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

9 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

11 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

23 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

23 तास ago