शिरूर तालुका

विद्यार्थ्यांचे कल्याण यातच शिक्षकाचे समाधान: सुर्यकांत बढे

शिक्रापूरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडे येथील १९९९ सालची इयत्ता सातवी च्या बॅचचे रविवारी (ता. २१) तब्बल चोवीस वर्षांनी स्नेहसंमेलन संपंन्न झाले. यावेळी चोवीस वर्षापूर्वी एकत्र शिकलेली, खेळलेली सर्व मुले-मुली आपल्या मुलांसह एकत्र जमले होते.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. सातवीपर्यंतचे वर्गशिक्षक सुर्यकांत बढे गुरुजी व आठवी ते दहावी चे वर्गशिक्षक श्री. औटी सर व श्री. साळुंके सर यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. बढे गुरुजी यांनी सांगितले कि, ‘विद्यार्थ्यांचे कल्याण झाले तरच शिक्षकांना समाधान वाटते. शिक्षक निस्वार्थीपणे आपल्याकडे असलेले सर्व विद्यार्थ्यांना देत असतो. प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुवतीप्रमाणे ते घेत असतो.’

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्चना तांबे, प्रदिप डांगे, अश्विनी शिंदे, गणेश काळे, गणेश भरणे, अनिल तांबे, उज्वला तांबे, लता शेवाळे, सलिम मुलाणी, रविंद्र डांगे, आक्का फंड, सुमित्रा शेवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश काळे यांनी तर अर्चना तांबे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago