शिरूर तालुका

विद्यार्थ्यांचे कल्याण यातच शिक्षकाचे समाधान: सुर्यकांत बढे

शिक्रापूरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडे येथील १९९९ सालची इयत्ता सातवी च्या बॅचचे रविवारी (ता. २१) तब्बल चोवीस वर्षांनी स्नेहसंमेलन संपंन्न झाले. यावेळी चोवीस वर्षापूर्वी एकत्र शिकलेली, खेळलेली सर्व मुले-मुली आपल्या मुलांसह एकत्र जमले होते.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. सातवीपर्यंतचे वर्गशिक्षक सुर्यकांत बढे गुरुजी व आठवी ते दहावी चे वर्गशिक्षक श्री. औटी सर व श्री. साळुंके सर यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. बढे गुरुजी यांनी सांगितले कि, ‘विद्यार्थ्यांचे कल्याण झाले तरच शिक्षकांना समाधान वाटते. शिक्षक निस्वार्थीपणे आपल्याकडे असलेले सर्व विद्यार्थ्यांना देत असतो. प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुवतीप्रमाणे ते घेत असतो.’

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्चना तांबे, प्रदिप डांगे, अश्विनी शिंदे, गणेश काळे, गणेश भरणे, अनिल तांबे, उज्वला तांबे, लता शेवाळे, सलिम मुलाणी, रविंद्र डांगे, आक्का फंड, सुमित्रा शेवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश काळे यांनी तर अर्चना तांबे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

5 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

5 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

5 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

14 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

14 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

14 तास ago