शिरुर (अरुणकुमार मोटे) पंढरपूर येथे सर्व भाविक आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी जात असतात, प्रत्येकाला वाटते तिथे जाऊन दर्शन घ्यावे, परंतु काहींना परिस्थितीमुळे शक्य होत नाही. देव हा माणसातच आहे, तुम्ही सर्व महिला या देवच आहात, कधीही काही अडचणी आल्या तरी तुम्ही नेहमी घरच्यासारखे येऊन सांगत जा. महिलांच्या ज्या सरकारी योजना आहेत त्या बाबत सर्वांना माहिती सांगितली असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी केले. यावेळी महिलांना आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, महिलांनीचं एकमेकांना समजून घेऊन,अडचणीच्या वेळेस कोणताही भेदभाव न करता मदत केली पाहीजे. मनुष्यजीवन एकदाचं आहे. त्यामुळे माणसातच आपण देव पाहिला पाहिजे. आपल्याला पंढरपुरला जाऊन जरी देवाचे दर्शन घेता आले नाही. तरी चालेल परंतु जो अडचणीत आहे, जो भुकेला आहे, त्याला सहकार्य करा त्यातच आपल्याला विठ्ठल भेटेल.
यावेळी राणी कर्डिले, डॉ स्मिता कवाद, गीता आढाव, सीमा शिंदे, संगीता शेवाळे, संगीता रोकडे, ज्योती लोखंडे, शितल शर्मा, निर्मला ढोकले, ललिता पोळ, सविता बोरुडे, कल्पना चांदगुडे, दुर्गा ननवरे, प्रीती बनसोडे, राजश्री शेजवळ, भाग्यश्री लिंगे, मनीषा टेभेंकर, सुजाता रासकर, सागर नरवडे, राजुद्दीन सयद,अमित शिर्के, प्रशांत पवार, हाफिस बागवान, कलीम सय्यद, युवराज सोनार, राहील शेख, ऋषभ मुथा, आदित्य उबाळे, हर्षद शेख तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?
शिरुर; कृषी दिनानिमित्त कृषी सहायक जयवंत भगत यांचा सन्मान
दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…