शिरूर तालुका

वाजेवाडी ग्रामसभेत सांस्कृतिक कला केंद्र ठरावाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध अखेर ना मंजुरी

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कला केंद्राला ग्रामसभेत ठाम विरोध दर्शविण्यात आला असुन गुरुवार (दि. 21) रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कला केंद्राला परवानगी न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

ग्रामपंचायतीकडे आलेल्या परवानगी अर्जावर चर्चा करताना ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत गावात असे केंद्र होऊ नये, अशी भूमिका घेतली. यापूर्वी महिलांची स्वतंत्र सभा घेण्यात आली होती. त्यावेळी महिलांनीही केंद्राला विरोध करत रजिस्टर वरती 65 स्वाक्षरी करत विरोध नोंदविला होता.

ग्रामसभा ज्येष्ठ सदस्य यशोदा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन. यावेळी सरपंच, उपसरपंच अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सभेत चैताली वाजे, औदुंबर भोंडवे, सुरेखा मांजरे, मंगल तिखे, रामदास मांजरे, संदीप भोर, ग्रामपंचायत अधिकारी मंगल लगड, (ढमढेरे)पोलीस पाटील सोनाली वाजे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दादा वाजे आदी ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.

गावात अनेक पक्षांचे पदाधिकारी असून, सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीस या पुढाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago