शिरूर तालुका

मुखईच्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारातून दृष्टी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांतून एक नवी दृष्टी निर्माण करण्यात आली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या हस्ते पूजन करत यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख रूपसिंग मल्लाव, सिमा पाटील यांच्या नियोजनातून आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेतला, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषण ही एक कला असून त्या कलेवर कशाप्रकारे प्रभुत्व मिळवता येईल यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे.

याविषयीचे अतिशय समर्पक असे दाखले देत, हास्य शैलीमधून एका विषयातून दुसऱ्या विषयात लीलया प्रवेश करत लोकमान्य टिळकांचे कार्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवत, लोकमान्य टिळकांच्या कार्याचा वसा आणि वारसा आपणाला पुढे चालवायचा असेल तर त्यांचे आदर्श आपण आपल्यामध्ये उतरवले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता लिमगुडे यांनी केले तर प्रास्ताविक रुपाली नागवडे यांनी केले आणि मनोज धिवार यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

10 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

11 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

15 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

1 दिवस ago