शिरूर तालुका

वाजेवाडी गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले दत्तक

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील छोटेसे असलेले गाव यापूर्वी खासदार गिरीश बापट यांनी दत्तक घेतलेले होते. सध्या सदर गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दत्तक घेतले असल्याने गावच्या विकासाला गती मिळणार असल्याचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी सांगितले.

वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील लहानसे असलेले गाव गावामध्ये विकास करुन गाव आदर्श करण्यासाठी यापूर्वी खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक असलेले अमित सोनवणे यांच्या माध्यमातून खासदार गिरीश बापट यांनी सदर गाव दत्तक घेतले असल्याने गावामध्ये मोठा विकास निधी उपलब्ध होऊन गावातील विकास कामांना गती मिळाली होती.

सध्या गावातील यात्रेबाबत निमंत्रण देण्यासाठी माजी उपसरपंच अमित सोनवणे व काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत गावची माहिती दिली असताना पालकमंत्र्यांनी आपण देखील सदर गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर केल्याने ग्रामस्थांमध्ये ऐन यात्रेच्या वेळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाजेवाडी गाव दत्तक घेतल्याने नुकतेच विधान परिषदेचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानत गावामध्ये 10 लक्ष रुपये निधीतून बैलगाडा घाट व गायरान मध्ये 25 लक्ष रुपये निधीतून क्रिकेट मैदान तयार करण्याची विनंती केली आहे, तर सध्या गावातील सर्व विकास कामे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावली जाणार असल्याची माहिती माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

28 मिनिटे ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

2 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

2 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

2 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

2 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

2 तास ago