इतर

…अन बिबट्याची ती पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत विसावली

अमरावती: शहरातील महादेव खोरी नजीकच्‍या जंगलात गुरुवार (दि. 1) रोजी बिबट्याचे 2 बछडे आढळून आले होते. आईपासून त्‍यांची ताटातूट झाली होती. बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्‍यात शनिवार (दि. 3) रोजी पहाटे वनविभागाला यश आले.

दोन दिवसानंतर बिबट्याची ही पिल्‍ले आईच्‍या कुशीत विसावली. गुरुवारी सकाळी नागरिकांना हे बछडे आढळून आले होते. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्‍यानंतर वडाळी येथील वनउद्यानात ठवेले होते. दोन दिवस या ठिकाणी त्‍यांची देखभाल करण्‍यात आली.

त्‍या दरम्‍यान वनविभागाने या बछड्यांसोबत मादी बिबट्याची भेट घडवून आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले होते. शनिवारी सकाळी बिबट्यांच्या या 2 बछड्यांची आईसोबत वनविभागाच्‍या पथकाने भेट घडवून आणली. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, वनपाल अमोल गावणेर आणि त्‍यांच्‍या चमूने त्‍यासाठी बरेच परिश्रम घेतले. या बछड्यांना आता त्‍यांच्‍या नैसर्गिक अधिवासात आईसोबत राहता येणार आहे.

महादेव खोरी परिसराच्‍या जवळ वनविभागाने वनीकरण केले आहे. पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग मानला जातो. गुरुवारी सकाळी काही जणांना या परिसरात बिबट्याचे दोन बछडे दिसून आले होते. या बछड्यांना त्यांच्या जन्मदात्रीकडे परत सोडण्याचे प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी व्यक्त केली होती. वनविभागाच्‍या या कामगिरीबद्दल यादव तरटे यांनी समाधान व्‍यक्‍त केले आ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

2 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

2 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

2 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

19 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

19 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

19 तास ago