Categories: इतर

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे कुटुंबाविषयी काढलेल्या अभद्र वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तहसिल कार्यालय शिरुर येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सलग 3 महिन्यांपासून होणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली.

या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार, शिवसेना शिरुर शहरप्रमुख सुनील जाधव, शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ, जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार कैलास भोसले, माजी तालुकाप्रमुख अनिल कोल्हे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपतालुका प्रमुख अनिल पवार, संतोष काळे, तालुका महिला आघाडीचे संगीता शिंदे, सुमन वाळुंज, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, लालासाहेब वाघचौरे, उपशहर प्रमुख पप्पूदादा गव्हाणे, विभागप्रमुख निलेश गवळी, विशाल फलके, निलेश जगताप, युवासेना उपतालुकाधिकारी राहुल मोहळकर, युवासेना उपशहर अधिकारी अण्णा रेड्डी, आकाश क्षिरसागर, कुंडलिक पवार, दिने जगताप, भिमराव कुदळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल बाप्पू गाडे, आबासाहेब काळे, अनिल कर्पे, विभाग प्रमुख पोपट ढवळे, सुनील जठार, महेंद्र येवले, सुरज काळे, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, यश धनी, सुरेश आरेवार, शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रामदास कदम गद्दार आहे त्याचे करायचे काय खाली डोके वर पाय… शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ची नाही कुणाच्या बापाची …ed सरकार हाय हाय… गेल्या 3 महिन्यांपासून शिरुर तालुका व राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून सतत पडणारे या पावसामुळे शेती पिके शेतीमाल, अरणीतील कांदे, रोपे यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी अद्याप त्या ठिकाणी चे पंचानामे नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे लवकरात लवकर पंचनामे करुन या शेतकऱ्यांना मदत मिळावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी शेतकरी सेनेचे योगेश्वर व उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, आंबेगाव शिरुर प्रमूख गणेश जामदार यांनी केली.

शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची असून आल्या गेल्या आणि गद्दारांची नाही या पुढील काळात गद्दारांना धडा शिकवणार असल्याचे शिरुर शहर प्रमुख सुनिल जाधव यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

9 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

10 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

10 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

12 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

13 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

13 तास ago