सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे कुटुंबाविषयी काढलेल्या अभद्र वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तहसिल कार्यालय शिरुर येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सलग 3 महिन्यांपासून होणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार, शिवसेना शिरुर शहरप्रमुख सुनील जाधव, शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ, जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार कैलास भोसले, माजी तालुकाप्रमुख अनिल कोल्हे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपतालुका प्रमुख अनिल पवार, संतोष काळे, तालुका महिला आघाडीचे संगीता शिंदे, सुमन वाळुंज, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, लालासाहेब वाघचौरे, उपशहर प्रमुख पप्पूदादा गव्हाणे, विभागप्रमुख निलेश गवळी, विशाल फलके, निलेश जगताप, युवासेना उपतालुकाधिकारी राहुल मोहळकर, युवासेना उपशहर अधिकारी अण्णा रेड्डी, आकाश क्षिरसागर, कुंडलिक पवार, दिने जगताप, भिमराव कुदळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल बाप्पू गाडे, आबासाहेब काळे, अनिल कर्पे, विभाग प्रमुख पोपट ढवळे, सुनील जठार, महेंद्र येवले, सुरज काळे, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, यश धनी, सुरेश आरेवार, शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रामदास कदम गद्दार आहे त्याचे करायचे काय खाली डोके वर पाय… शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ची नाही कुणाच्या बापाची …ed सरकार हाय हाय… गेल्या 3 महिन्यांपासून शिरुर तालुका व राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून सतत पडणारे या पावसामुळे शेती पिके शेतीमाल, अरणीतील कांदे, रोपे यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी अद्याप त्या ठिकाणी चे पंचानामे नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे लवकरात लवकर पंचनामे करुन या शेतकऱ्यांना मदत मिळावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी शेतकरी सेनेचे योगेश्वर व उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, आंबेगाव शिरुर प्रमूख गणेश जामदार यांनी केली.
शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची असून आल्या गेल्या आणि गद्दारांची नाही या पुढील काळात गद्दारांना धडा शिकवणार असल्याचे शिरुर शहर प्रमुख सुनिल जाधव यांनी सांगितले.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…