Categories: इतर

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे कुटुंबाविषयी काढलेल्या अभद्र वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तहसिल कार्यालय शिरुर येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सलग 3 महिन्यांपासून होणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली.

या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार, शिवसेना शिरुर शहरप्रमुख सुनील जाधव, शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ, जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार कैलास भोसले, माजी तालुकाप्रमुख अनिल कोल्हे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपतालुका प्रमुख अनिल पवार, संतोष काळे, तालुका महिला आघाडीचे संगीता शिंदे, सुमन वाळुंज, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, लालासाहेब वाघचौरे, उपशहर प्रमुख पप्पूदादा गव्हाणे, विभागप्रमुख निलेश गवळी, विशाल फलके, निलेश जगताप, युवासेना उपतालुकाधिकारी राहुल मोहळकर, युवासेना उपशहर अधिकारी अण्णा रेड्डी, आकाश क्षिरसागर, कुंडलिक पवार, दिने जगताप, भिमराव कुदळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल बाप्पू गाडे, आबासाहेब काळे, अनिल कर्पे, विभाग प्रमुख पोपट ढवळे, सुनील जठार, महेंद्र येवले, सुरज काळे, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, यश धनी, सुरेश आरेवार, शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रामदास कदम गद्दार आहे त्याचे करायचे काय खाली डोके वर पाय… शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ची नाही कुणाच्या बापाची …ed सरकार हाय हाय… गेल्या 3 महिन्यांपासून शिरुर तालुका व राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून सतत पडणारे या पावसामुळे शेती पिके शेतीमाल, अरणीतील कांदे, रोपे यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी अद्याप त्या ठिकाणी चे पंचानामे नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे लवकरात लवकर पंचनामे करुन या शेतकऱ्यांना मदत मिळावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी शेतकरी सेनेचे योगेश्वर व उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, आंबेगाव शिरुर प्रमूख गणेश जामदार यांनी केली.

शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची असून आल्या गेल्या आणि गद्दारांची नाही या पुढील काळात गद्दारांना धडा शिकवणार असल्याचे शिरुर शहर प्रमुख सुनिल जाधव यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

20 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

20 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

20 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

20 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

20 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

20 तास ago