मुंबई: सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणारी संस्था सायबर एक्स ९ कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. VI या टेलिकॉम कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या काही गोंधळांमुळे २ कोटी ग्राहकांचा कॉल डेटा उघड्यावर पडला आहे. कधी, कोणी, कोणाला फोन केला, किती वेळ बोलणं झालं, हे सगळंच्या सगळं आता जाहीर झालं आहे.
VI ची पोस्टपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांचा डेटा आता धोक्यात आला आहे. फोन कुठून केला, कोणाला केला, ज्याला फोन केला त्याचं लोकेशन, ग्राहकाचं पूर्ण नाव, पत्ता, मेसेजेसचे डिटेल्स असा सगळा डेटा या सिस्टममधल्या चुकीमुळे उघडा पडला आहे. या सायबर एक्स ९ चे संस्थापक आणि संचालक हिमांशू पाठक यांनी सांगितलं की आपण व्होडाफोन इंडियाला आपल्या कंपनीचा अहवाल मेलवरुन पाठवला आहे.
पाठक म्हणाले की, २२ ऑगस्टला VI नेही कन्फर्म केलं की आमचा अहवाल त्यांना मिळाला आहे. आपल्या सिस्टममध्ये हा गोंधळ झाल्याची कबुलीही VI ने २४ ऑगस्ट रोजी दिली आहे. मात्र व्होडाफोन आय़डिया कंपनीने मात्र हा दावा नाकारला आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे, अशा प्रकारे ग्राहकांचा उघड्यावर पडलेला नाही. हा अहवाल खोटा आहे. VI कडे ग्राहकांच्या डेटाच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे.
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…