इतर

VI च्या दोन कोटींहून अधिक ग्राहकांचा डाटा उघड्यावर? कसा तो पहा…

मुंबई: सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणारी संस्था सायबर एक्स ९ कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. VI या टेलिकॉम कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या काही गोंधळांमुळे २ कोटी ग्राहकांचा कॉल डेटा उघड्यावर पडला आहे. कधी, कोणी, कोणाला फोन केला, किती वेळ बोलणं झालं, हे सगळंच्या सगळं आता जाहीर झालं आहे.

VI ची पोस्टपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांचा डेटा आता धोक्यात आला आहे. फोन कुठून केला, कोणाला केला, ज्याला फोन केला त्याचं लोकेशन, ग्राहकाचं पूर्ण नाव, पत्ता, मेसेजेसचे डिटेल्स असा सगळा डेटा या सिस्टममधल्या चुकीमुळे उघडा पडला आहे. या सायबर एक्स ९ चे संस्थापक आणि संचालक हिमांशू पाठक यांनी सांगितलं की आपण व्होडाफोन इंडियाला आपल्या कंपनीचा अहवाल मेलवरुन पाठवला आहे.

पाठक म्हणाले की, २२ ऑगस्टला VI नेही कन्फर्म केलं की आमचा अहवाल त्यांना मिळाला आहे. आपल्या सिस्टममध्ये हा गोंधळ झाल्याची कबुलीही VI ने २४ ऑगस्ट रोजी दिली आहे. मात्र व्होडाफोन आय़डिया कंपनीने मात्र हा दावा नाकारला आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे, अशा प्रकारे ग्राहकांचा उघड्यावर पडलेला नाही. हा अहवाल खोटा आहे. VI कडे ग्राहकांच्या डेटाच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

2 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

2 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

2 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

19 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

19 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

19 तास ago