क्राईम

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ सुरु असल्याचा आवाज आल्याने सुरेखा या बाहेर आल्या. त्यावेळी सागर मल्लाव व महेश मल्लाव यांच्यात वाद सुरु होते त्यामुळे सुरेखा यांनी मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केले असता सोनाली मल्लाव हिने तू मध्ये का पडतेस असे म्हणत दमदाटी करुन सुरेखा यांना हाताने मारहाण करण्यास सुरवात केली.

दरम्यान महेश मल्लाव याने शेजारी पडलेली काचेची बाटली सुरेखा यांच्या डोक्यात फोडून त्यांना जखमी करत मारहाण केली. याबाबत सुरेखा गजेंद्र परदेशी (वय ४०) रा. काचे आळी शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव दोघे रा. काचे आळी शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रतापराव टेंगले हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

46 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago