शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून अनेक लहान मोठ्या घटना घडत असताना केंदूर येथील महादेव वाडी मध्ये चुलत भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली असून आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी मधील विलास साकोरे व त्याची चुलत बहीण आशा साकोरे यांच्यात जमिनीच्या वाटपातून वाद सुरू होते. अनेक दिवस वाद सुरु असल्याने सायंकाळच्या सुमारास आशा ही महिला घरासमोरील रस्त्याने जात असताना विलास साकोरे हा सदर ठिकाणी कोयता घेऊन आला आणि आशाच्या डोक्यात व अंगावर वार केले. यावेळी आशा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मयत झाली.
सदर घटनेत आशा भागोजी साकोरे रा. महादेव वाडी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, वैभव स्वामी, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवलदार शिवाजी चितारे, पोलीस नाईक विशाल देशमुख, आत्माराम तळोले, राहुल वाघमोडे, अमोल दांडगे, किशोर शिवणकर, प्रताप कांबळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीने खून करणाऱ्या विलास यशवंत साकोरे रा. महादेव वाडी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता जमिनीच्या वादातून सदर खून केल्याची कबुली त्यांनी दिली तर रात्री उशिरा पर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…