लातूर: “आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?” असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी खोपेगाव (ता. लातूर) येथे घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
खोपेगाव पाटी परिसरात राहणारे कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) हे लातूर येथील आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास कृष्णकुमार आणि त्यांचा मोठा मुलगा शंतनू (वय २९) यांच्यात वाद झाला. शंतनूची आई आजारी असून औषधोपचारासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली जात होती. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात शंतनूने घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून वडिलांच्या मानेखाली जोरदार वार केला. हा वार इतका भीषण होता की, कृष्णकुमार सन्मुखराव यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मयताचा धाकटा मुलगा समीर कृष्णकुमार सन्मुखराव (वय २३) याने दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी शंतनूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आरोपी शंतनू हा पदवीधर असून बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णकुमार सन्मुखराव यांनी खोपेगाव पाटी येथे जागा खरेदी करून नवीन घर बांधले होते. मंगळवारी सकाळी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असताना पत्नी व मुलामधील औषधोपचाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडली.
“औषध-गोळ्यांच्या खर्चावरून आई-वडील आणि मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला,” अशी माहितीअरविंद पवार, पोलिस निरीक्षक, लातूर ग्रामीण यांनी दिली.
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…
पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…
शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…
अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…