क्राईम

शिरुर शहरात जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

शिरुर: शिरूर शहरात अनेक ठिकाणी अवैधरीत्या जुगार, मटका खेळत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत लागताच पोलिसांनी अचानक छापा टाकत टाकला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले असून, दोन जण पळून गेले आहेत. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र पोपट गोपाळे यांनी फिर्याद दिली आहे. पाच जणाविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना खबऱ्या मार्फत शिरुर शहरातील कामाठीपुरा येथे अवैध जुगार क्लब चालू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच राऊत यांनी तत्काळ उपनिरीक्षक उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे व दोन पंच यांचे पथक तयार करून छापा मारण्याची सूचना केली होती.

रविवारी (ता. १७) दुपारी अडीचच्या सुमारास माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता १) दाऊद ईस्माईल शहा (रा. शनिमंदीर), २) पवन झुंबरलाल कोठारी (रा. आनंद सोसायटी रामलिंगरोड), ३) मनोहर जयवंत मस्के (रा. बुरुडआळी), ४) बबलु सय्यद (रा. बुरुडआळी), ५ ) पिनु गंगावणे (रा. कामाठीपुरा) हे सर्वजण बेकायदा जुगार खेळत असताना सापडले. त्यावेळी दाऊद शहा, पवन कोठारी, मनोहर मस्के या तिघांना पोलिसांनी जागेवरच अटक केली. परंतु, बबलू सय्यद आणि पिनू गंगावणे हे पळून गेले आहेत. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिक नाईक शिंदे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

3 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

10 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

10 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

10 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

10 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

10 तास ago