क्राईम

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मृत बाळासाहेब तांबे हे वरुडे येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करत होते. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे वरुडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तांबे यांच्या कुटुंबातील सदस्य सोमवारी पहाटेच्या सुमारास बाहेर आले असता, त्यांना बाळासाहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले आणि एकच आक्रोश केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कष्टाळू शेतकऱ्याचा अशा प्रकारे झोपेतच खून झाल्यामुळे संपूर्ण वरुडे गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने वरुडे गावात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब तांबे यांचा कोणाशी कौटुंबिक वाद, जमिनीचा वाद किंवा जुने वैमनस्य होते का? या अंगाने पोलीस तपास करत आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा (कलम 302अन्वये) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. अंगणात झोपलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे गळा चिरून खून झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, परिसरात कमालीची भीती पसरली आहे.

वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

1 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago