क्राईम

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

रांजणगाव गणपती: ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर झोपली असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गावातील विजय पाचंगे मुलीजवळ गेला आणि त्याने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील अल्पवयीन मुलगी झोपली असताना आरोपी विजय पाचंगे हा मुलीच्या घरासमोर आला. त्याने मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून विनयभंग केला. यावेळी अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केली असता तिचे कुटुंबीय झोपतून जागे झाले. त्याचवेळी विजय हा तेथून पळून गेला.

घडलेल्या प्रकाराबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय बाळासाहेब पाचंगे (रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता काळे करत आहे.

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

शिरुर तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागापायी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केला ऍसिड हल्ला…

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शब्दवीर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा टोकदार वार

मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…

30 मिनिटे ago

ठाण्यात पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू; प्रवास होणार अधिक सुखकर

ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…

37 मिनिटे ago

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…

45 मिनिटे ago

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

1 दिवस ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

1 दिवस ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

1 दिवस ago