क्राईम

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत दिलीप भोसले( वय ४३) रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर यांचे त्यांची सुन अंजली रुवल काळे हिच्या सोबत प्रापंचिक वाद झाले होते. या वादाच्या कारणावरुन सुनेचे दोन भाऊ १) नागरेष बाजीराव काळे २) राजेश बाजीराव काळे व एक बहीण ३) निघु बाजीराव काळे सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर यांनी कोयत्याच्या उलट्या बोथट बाजूने वसंत भोसले यांच्या छातीत, पायावर मारुन डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली होती.

 

त्या जबर मारहाणीत वसंत भोसले हे (दि ५) ऑगस्ट रोजी मरण पावले. या खून प्रकरणी नागरेश बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे ,निघु बाजीराव काळे यांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.

पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago