शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समिती शिरुर येथील बहुचर्चित बी.ओ.टी प्रकल्पातील व्यापारी गाळयासाठी शिरुर येथील सिमा गिरमकर (रा. शिरुर) या महिलेने बुकींग करुन सन २०१५ पासून २०२२ पर्यंत ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना गाळा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक व आर्थिक छळ झाला असुन त्यांना याबाबत न्याय मिळत नसल्याने त्या कुंटुबासह त्याच इमारतीवरुन स्वातंत्र्यदिनी (दि. १५) ऑगस्ट रोजी उडी मारुन जीवनयात्रा संपवणार आहेत. याबाबत लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार, शिरुरचे तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन यांना दिले आहे.
सिमा गिरमकर यांनी मोठ्या कष्टाने पै-पै गोळा करुन व्यवसायासाठी गाळा घेण्याचे ठरवले होते. ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने अद्याप त्यांना त्या गाळ्याचे खरेदीखत करुन दिलेले नाही. ठेकेदाराला भरलेले पैसे बँक नियमाप्रमाणे दुप्पट पैसे झाले असते. त्यांनी वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली होती .
त्यामुळे पंचायत समिती बीओटी ठेकेदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्यापासून होणाऱ्या त्यांच्या आर्थिक व मानसिक छळा पासून त्यांना न्याय मिळेल का…? त्यांच्या कुटुंबाच्या कष्टाच्या भरलेल्या पैशातुन त्यांना जगण्यासाठी घेतलेला गाळा त्यांना आता मिळेल का.. ? अशा एका असह्य महिलेने तिला हक्काचा न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला असुन त्यांना न्याय न मिळाल्यास त्या आता १५ ऑगस्ट रोजी सहकुटुंब त्याच बीओटी इमारतीवरुन उडी मारणार आहे. किंवा सतरा कमानी पुलावरुन उडी मारुन जलसमाधी घेणार आहेत. याबाबत पोलिस प्रशासन, पंचायत समिती काय भुमिका घेणार…? याकडे शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्याला केले ठार
कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?
शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…