क्राईम

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली जात होती. सुशिक्षित असूनही सासरकडून होत असलेल्या प्रचंड मानसिक दडपणाखाली त्या होत्या. अखेर, या सततच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विवाहितेनं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी वाघोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत रचयिता यांचा पती अभिषेक सुरेशचंद्र गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. अभिषेकसह कुटुंबातील इतर चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चशिक्षित कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक आहिरे करत आहेत.

दरम्यान, वाघोलीच्या घटनेच्या दिवशीच जवळच असलेल्या आव्हाळवाडी परिसरातही एका २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. प्रतीक्षा जयसिंग कदम असे तिचे नाव असून, सोन्याची अंगठी आणि गाडीचे हप्ते फेडण्यासाठी सासरच्यांकडून पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणी तिचा पती जयसिंग कदम याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

वाघोली येथील शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…

वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

4 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

4 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

4 तास ago