वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली जात होती. सुशिक्षित असूनही सासरकडून होत असलेल्या प्रचंड मानसिक दडपणाखाली त्या होत्या. अखेर, या सततच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विवाहितेनं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी वाघोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत रचयिता यांचा पती अभिषेक सुरेशचंद्र गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. अभिषेकसह कुटुंबातील इतर चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चशिक्षित कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक आहिरे करत आहेत.
दरम्यान, वाघोलीच्या घटनेच्या दिवशीच जवळच असलेल्या आव्हाळवाडी परिसरातही एका २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. प्रतीक्षा जयसिंग कदम असे तिचे नाव असून, सोन्याची अंगठी आणि गाडीचे हप्ते फेडण्यासाठी सासरच्यांकडून पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणी तिचा पती जयसिंग कदम याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!
वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…
वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला
वाघोली येथील शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…
वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…