क्राईम

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली जात होती. सुशिक्षित असूनही सासरकडून होत असलेल्या प्रचंड मानसिक दडपणाखाली त्या होत्या. अखेर, या सततच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विवाहितेनं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी वाघोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत रचयिता यांचा पती अभिषेक सुरेशचंद्र गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. अभिषेकसह कुटुंबातील इतर चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चशिक्षित कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक आहिरे करत आहेत.

दरम्यान, वाघोलीच्या घटनेच्या दिवशीच जवळच असलेल्या आव्हाळवाडी परिसरातही एका २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. प्रतीक्षा जयसिंग कदम असे तिचे नाव असून, सोन्याची अंगठी आणि गाडीचे हप्ते फेडण्यासाठी सासरच्यांकडून पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणी तिचा पती जयसिंग कदम याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

वाघोली येथील शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…

वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

46 मिनिटे ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

6 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

6 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

6 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

6 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

6 तास ago