शिरूर तालुका

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय परिवाराच्या वतीने अक्षय तृतीया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील दाम्पत्यांच्या हस्ते शेती व भूमीचे पूजन करून कृषी हीच खरी अक्षय संपत्ती असल्याचा संदेश देण्यात आला. स्वाध्याय परिवाराच्या पुढाकाराने शेती व भूमीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक बैलगाडीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

व्यवसाय आणि नोकरी क्षणभंगुर असली तरी शेती अनादी काळापासून मानवाच्या जीवनाचा आधार राहिली आहे. देशातील ८० टक्के समाज कृषी संस्कृतीशी एकनिष्ठ असून हाच खरा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. पावसामुळे पीक येईल या विश्वासाने शेतकरी पेरणी करतो, ही उदाहरणे देत कृषी संस्कृतीतील विश्वासाचे महत्त्व याप्रसंगी विशद करण्यात आले.

अक्षय तृतीयेनिमित्त वाघाळे गावातून आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. फुला-पानांनी सजवलेली पारंपरिक बैलगाडी या यात्रेचे आकर्षण ठरली. भगवान योगेश्वरांच्या नामस्मरणात महिला, पुरुष, युवक व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर बांधावर जाऊन कृषी अवजारांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी श्रीसूक्तम्, नित्य पावन स्मरण स्तोत्र व नारायणोपनिषद् आदी स्तोत्रांचे सामूहिक पठण झाले.

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवा हा भगवद्गीतेचा सिद्धांत योगेश्वर कृषीच्या माध्यमातून वाघाळे गावात साकार होत आहे. हा केवळ शेतीचा नव्हे तर मानवी जीवन विकसित करणारा प्रयोग असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

6 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

6 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

6 तास ago