waghale-krushi-pujan
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय परिवाराच्या वतीने अक्षय तृतीया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील दाम्पत्यांच्या हस्ते शेती व भूमीचे पूजन करून कृषी हीच खरी अक्षय संपत्ती असल्याचा संदेश देण्यात आला. स्वाध्याय परिवाराच्या पुढाकाराने शेती व भूमीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक बैलगाडीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
व्यवसाय आणि नोकरी क्षणभंगुर असली तरी शेती अनादी काळापासून मानवाच्या जीवनाचा आधार राहिली आहे. देशातील ८० टक्के समाज कृषी संस्कृतीशी एकनिष्ठ असून हाच खरा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. पावसामुळे पीक येईल या विश्वासाने शेतकरी पेरणी करतो, ही उदाहरणे देत कृषी संस्कृतीतील विश्वासाचे महत्त्व याप्रसंगी विशद करण्यात आले.
अक्षय तृतीयेनिमित्त वाघाळे गावातून आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. फुला-पानांनी सजवलेली पारंपरिक बैलगाडी या यात्रेचे आकर्षण ठरली. भगवान योगेश्वरांच्या नामस्मरणात महिला, पुरुष, युवक व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर बांधावर जाऊन कृषी अवजारांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी श्रीसूक्तम्, नित्य पावन स्मरण स्तोत्र व नारायणोपनिषद् आदी स्तोत्रांचे सामूहिक पठण झाले.
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवा हा भगवद्गीतेचा सिद्धांत योगेश्वर कृषीच्या माध्यमातून वाघाळे गावात साकार होत आहे. हा केवळ शेतीचा नव्हे तर मानवी जीवन विकसित करणारा प्रयोग असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!
वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!
वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…
शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…