क्राईम

शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावच्या हद्दीत सावी हॉटेलसमोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलांवर काळ्या रंगाच्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी रात्री ०९:४५ वाजता सदरवाडी गावच्या सावी हॉटेलसमोर नगर-पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर विद्या संदीप शेवाळे (वय ४२, रा. कारेगाव) या आपल्या कुटुंबासोबत रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील अनोळखी चालक भरधाव वेगाने, बेदरकारपणे व रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवत होता. त्याने त्यांच्या आई रुख्मिणी परशुराम मते यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात रुख्मिणी मते यांच्या डाव्या पायाचा खुबा, डावा दंड, तोंडाचा जबडा फ्रॅक्चर झाला असून उजव्या हाताला खरचटले आहे. छातीतसुद्धा किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर संबंधित चालक मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा कळमकर करीत आहेत.अपघातानंतर मोटारसायकल चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

6 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

6 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago