मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी मलाही भाजपकडून प्रवेशाची ऑफर होती. पण माझ्या रक्तात काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार. काही जण त्यांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे काँग्रेस सोडून जात आहेत’, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसने तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. दिल्लीच्या वर्तुळात तुमचा – वावर आहे. या काळात भाजपकडून तुम्हाला – प्रवेशाची ऑफर येते का, या प्रश्नावर खासदार शिंदे म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी मला अनेकदा विचारणा झाली होती. पण मी पुरोगामी विचारांची आहे. काँग्रेसच्या विचारांवर माझा विश्वास असल्यामुळे त्यांचा विचार केला नाही.’
…तर काँग्रेसची सत्ता आली असती
‘लोकसभा निवडणुकीत मी गावोगावी फिरले. या काळात मला लोकांचा भाजपबद्दलचा रोष दिसून आला. देशभर ही परिस्थिती होती. आम्ही आणखी मेहनत घेतली असती तर काँग्रेसची सत्ता आली असती. लोकसभेच्या निकालामुळे भाजपचे लोक जागरूक झाले. त्यांनी खूप खालच्या पातळीचे राजकारण केले’, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
आम्हाला कशाची भीती ?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला घाबरून काँग्रेस पक्ष सोडला. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आमच्याकडे कारखाना, शिक्षण संस्था नाहीत. त्यामुळे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाला घाबरण्याचे काही कारण नाही.
लोक काय म्हणतात…
काँग्रेस सरकारच्या काळात आमच्यावर टीका व्हायची. ही टीका का होतेय हे समजून आम्ही काम करायचो. आता राज्यातील प्रशासनावर मोठा दबाव आहे. आता मी गावोगावी जाते. मागच्या दहा वर्षांत खासदार भेटत नव्हते. खासदार दिसत नव्हते, असे लोक सांगतात. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. निधी कमी पडतोय, असेही खासदार शिंदे म्हणाल्या.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…