देश

साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): अखनूरमधील विजय सिंह (वय २४) याला साप चावला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानतंर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण, अंत्यसंस्कारावेळी तो उठून उभा राहिल्यानंतर उपस्थितांना आनंदाचा धक्का बसला.

विजयला सर्पदंश झाल्याचं समजताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विजय बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या टीमने अनेक प्रयत्न करूनही विजय शुद्धीवर आला नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अखेर, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पण, कुटुंबीय विजयचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले आणि अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले. विजयचा मृतदेह स्मशानभूमीत नेला. तिथे त्याच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करण्यात आली होती. काहीच वेळात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

अंत्यसंस्काराच्या काही वेळ अगोदर विजयच्या शरीरात काही हालचाल दिसू लागली आणि त्यानंतर विजय चितेवरून उठून उभा राहिला. त्याला पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक लोक याला चमत्कार म्हणू लागले आहेत. तर विजयचे कुटुंबीय डॉक्टरांवर नाराज आहेत. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे आज आम्ही आमचा जिवंत मुलगा जाळला असता, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. आमच्या मुलाला वेळीच शुद्ध आली नसती तर त्याला जिवंत जाळले गेले असते. पण, संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…

Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

15 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

15 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

16 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

16 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago