मनोरंजन

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न
रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे पण घटस्फोट घेतल्यानंतर दोघे वेगळे झाले आहेत.

आमिर खान आणि रीना दत्ता यांनी ८० च्या दशकात प्रेमविवाह केला होता. त्याचं लव्ह लाईफही खूप मजेदार होतं. आमिर खान आणि रीना दत्ता हे शेजारी असल्याचं बोललं जातं. दोघांचे घर आजूबाजूला होते आणि आमिर खान पहिल्याच नजरेत रीना दत्ताच्या प्रेमात पडला होता. आमिरनेही रीना दत्तावरील प्रेम एका अनोख्या पद्धतीने व्यक्त केले. त्याने रक्ताने प्रेमपत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले. मात्र, आमिरच्या या कृतीने रीना संतापली. पण हळूहळू रीनाही आमिरच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांनी १८ एप्रिल १९८६ रोजी गुपचूप लग्न केले.

आमिर खान आणि रीना दत्ता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नानंतर दोघेही इरा खान आणि जुनैद खान यांचे आई वडील झाले. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते पण कालांतराने त्यांचे नाते बिघडू लागले. लग्नानंतर लगेचच आमिर खानचे इतर अभिनेत्रींसोबत लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे आमिर आणि रीनाच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे आमिर आणि रीनाचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि ते कायमचे वेगळे झाले.

मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि रीना भेटताना दिसत आहेत. ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. मैत्री आणि प्रेमाचे नाते निभावल्यानंतर आमिर आणि किरणने २००५ साली लग्न केले. यानंतर आमिर आणि किरण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे बनले, पण २०२१ च्या सुरुवातीला आमिर आणि किरणचा घटस्फोटही झाला. दोघांना एक मुलगा आझाद आहे. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकत्रच त्याची काळजी घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

2 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

7 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

7 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

7 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

7 तास ago