मनोरंजन

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न
रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे पण घटस्फोट घेतल्यानंतर दोघे वेगळे झाले आहेत.

आमिर खान आणि रीना दत्ता यांनी ८० च्या दशकात प्रेमविवाह केला होता. त्याचं लव्ह लाईफही खूप मजेदार होतं. आमिर खान आणि रीना दत्ता हे शेजारी असल्याचं बोललं जातं. दोघांचे घर आजूबाजूला होते आणि आमिर खान पहिल्याच नजरेत रीना दत्ताच्या प्रेमात पडला होता. आमिरनेही रीना दत्तावरील प्रेम एका अनोख्या पद्धतीने व्यक्त केले. त्याने रक्ताने प्रेमपत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले. मात्र, आमिरच्या या कृतीने रीना संतापली. पण हळूहळू रीनाही आमिरच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांनी १८ एप्रिल १९८६ रोजी गुपचूप लग्न केले.

आमिर खान आणि रीना दत्ता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नानंतर दोघेही इरा खान आणि जुनैद खान यांचे आई वडील झाले. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते पण कालांतराने त्यांचे नाते बिघडू लागले. लग्नानंतर लगेचच आमिर खानचे इतर अभिनेत्रींसोबत लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे आमिर आणि रीनाच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे आमिर आणि रीनाचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि ते कायमचे वेगळे झाले.

मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि रीना भेटताना दिसत आहेत. ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. मैत्री आणि प्रेमाचे नाते निभावल्यानंतर आमिर आणि किरणने २००५ साली लग्न केले. यानंतर आमिर आणि किरण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे बनले, पण २०२१ च्या सुरुवातीला आमिर आणि किरणचा घटस्फोटही झाला. दोघांना एक मुलगा आझाद आहे. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकत्रच त्याची काळजी घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

18 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

18 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

22 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago