मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न
रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे पण घटस्फोट घेतल्यानंतर दोघे वेगळे झाले आहेत.
आमिर खान आणि रीना दत्ता यांनी ८० च्या दशकात प्रेमविवाह केला होता. त्याचं लव्ह लाईफही खूप मजेदार होतं. आमिर खान आणि रीना दत्ता हे शेजारी असल्याचं बोललं जातं. दोघांचे घर आजूबाजूला होते आणि आमिर खान पहिल्याच नजरेत रीना दत्ताच्या प्रेमात पडला होता. आमिरनेही रीना दत्तावरील प्रेम एका अनोख्या पद्धतीने व्यक्त केले. त्याने रक्ताने प्रेमपत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले. मात्र, आमिरच्या या कृतीने रीना संतापली. पण हळूहळू रीनाही आमिरच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांनी १८ एप्रिल १९८६ रोजी गुपचूप लग्न केले.
आमिर खान आणि रीना दत्ता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नानंतर दोघेही इरा खान आणि जुनैद खान यांचे आई वडील झाले. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते पण कालांतराने त्यांचे नाते बिघडू लागले. लग्नानंतर लगेचच आमिर खानचे इतर अभिनेत्रींसोबत लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे आमिर आणि रीनाच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे आमिर आणि रीनाचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि ते कायमचे वेगळे झाले.
मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि रीना भेटताना दिसत आहेत. ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. मैत्री आणि प्रेमाचे नाते निभावल्यानंतर आमिर आणि किरणने २००५ साली लग्न केले. यानंतर आमिर आणि किरण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे बनले, पण २०२१ च्या सुरुवातीला आमिर आणि किरणचा घटस्फोटही झाला. दोघांना एक मुलगा आझाद आहे. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकत्रच त्याची काळजी घेत आहेत.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…