मनोरंजन

बिग बॉस मराठी ६! दिव्या शिंदेला धमकीमुळे घराबाहेर काढले!

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातील स्पर्धक दिव्या शिंदेला बिग बॉसनं तातडीने घराबाहेर काढलं आहे. कारण, तिने नॅशनल टेलिव्हिजनवर इतर स्पर्धकाला जीवावर मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसला सुरक्षेच्या कारणास्तव ही कठोर कारवाई करावी लागली.

घटनेनुसार, बिग बॉसमध्ये पार पडलेल्या एका टास्कदरम्यान घराबाहेरील स्पर्धकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे फुल टाकण्याचे आव्हान देण्यात आले होते. जेव्हा त्या टास्कमध्ये तन्वीची वेळ आली, तेव्हा तिने दिव्याचं नाव घेतलं. हे ऐकून दिव्याला राग आला आणि तिने घरातील इतर सदस्यांना जीव मारण्याची धमकी दिली. बिग बॉसने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दिव्या आपल्या मतावर ठाम राहिली.

नंतर तिला कन्फेशन रुममध्ये बोलावून तिची चूक सुधारण्याची संधी दिली गेली, पण दिव्या तिथे देखील ताठर होती. राकेशने तिला सौम्य भाषेचा वापर करण्याचा सल्ला दिला, परंतु राग अनावर असलेल्या दिव्याला काही फरक पडला नाही. शेवटी सर्व सदस्य हॉलमध्ये असताना, बिग बॉसने तिच्या चुकीचा उल्लेख केला आणि दंड म्हणून तिला घराबाहेर काढले.

दिव्याच्या बाहेर पडण्याने घरातील सर्व सदस्यांना धक्का बसला. विशेषतः दीपाली सय्यदच्या डोळ्यातून अश्रू ओघावले, मात्र दिव्याने न रडता सर्वांचा निरोप घेतला.ही घटना बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. याआधी पाचव्या सीझनमध्येही आर्या आणि निक्की यांच्यातील वादामुळे आर्याला घराबाहेर काढलं गेले होते, पण दिव्याच्या बाहेर पडण्याचा प्रकार आणखी धक्कादायक ठरला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

3 मिनिटे ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

7 मिनिटे ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

11 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

11 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

11 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

11 तास ago