मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यात सतत गैरसमज निर्माण करणाऱ्या अंशुमनचा अखेर खरा चेहरा समोर आला असून, स्वानंदीच्या धाडसामुळे श्वेताला न्याय मिळताना पाहायला मिळणार आहे.
स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं सुरुवातीपासूनच गैरसमज, भांडणांनी भरलेलं दिसत आहे. समरचा भाऊ अंशुमन आणि काकू मल्लिका यांच्या कारस्थानांमुळे हे गैरसमज अधिकच वाढले. कधी पैशांची लालच दाखवून, तर कधी समस्या निर्माण करून त्यासाठी स्वानंदीला जबाबदार ठरवण्यात आलं.
दरम्यान, मालिकेत अंशुमनने ऑफिसमधील सहकारी श्वेताचा छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. श्वेताने हा प्रकार समरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता तिला धमकी देण्यात आली. हे सर्व समजल्यानंतर स्वानंदीने श्वेताला मदत करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला अपयश आलं असलं, तरी अखेर स्वानंदीने ठोस पुराव्यासह समरसमोर सत्य मांडलं.
झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये राजवाडे कुटुंब एकत्र जमलेलं दिसत आहे. स्वानंदी समरला म्हणते, “ज्याला तुम्ही आदर्श भाऊ मानता, त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येणं खूप गरजेचं आहे.” त्यानंतर ती एक व्हिडीओ दाखवते. व्हिडीओ पाहताच समरचा संताप अनावर होतो.
समर अंशुमनला जाब विचारत म्हणतो, “तुझ्यावर विश्वास ठेवला रे. एवढा विकृत वागलास तू?” यावर अंशुमन श्वेताबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतो. ते ऐकताच समर अंशुमनच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, “इतकं खोटं वागण्याची आणि नालायकपणा करण्याची तुझ्यात हिंमत कुठून येते?”प्रोमोमध्ये पुढे श्वेता तिथे येते. आजी अंशुमनला तिची माफी मागायला सांगते. अखेर खाली बसून, हात जोडून अंशुमन श्वेताची माफी मागताना दिसतो.हा प्रोमो शेअर करत झी मराठीने कॅप्शन दिलं आहे, “अखेर अंशुमनचा खरा चेहरा समोर येत श्वेताला मिळणार न्याय.”
प्रोमो पाहताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “आता मालिकेला खरा रंग आला,” “हेच पाहण्यासाठी इतके दिवस वाट पाहत होतो,” “स्वानंदी एकदम बेस्ट,” “देव पावला,” “समरने मस्त कानाखाली वाजवली,” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.दरम्यान, आता पुढे मालिकेत आणखी कोणते नाट्य घडणार, स्वानंदी-समरच्या नात्याला नवी दिशा मिळणार का, याकडे प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…