मनोरंजन

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वेच्या लग्नाची लगबग सुरु, फक्त तीन दिवस उरले

मुंबई: मराठी कलाविश्वात सध्या लग्नांचा उत्साह रंगत आहे. नुकताच ‘फ्रेशर्स’ मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीडने लग्नगाठ बांधली, त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील ऋत्विक तळवलकरसुद्धा विवाहबंधनात अडकला.

आता यात आणखी एक लोकप्रिय कलाकार जोडी सामील होणार आहे. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींची सुरुवात झाली असून, तिने या सोहळ्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला असून, साक्षीने चाहत्यांसोबत या क्षणांची झलक शेअर केली आहे. तसेच, अथर्वच्या घरालाही लग्नासाठी आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्याने घरातील रोषणाईचे फोटो सोशल मीडियावर दिले आहेत.

दोघांच्या लग्नाला फक्त तीन दिवस उरले आहेत. या संदर्भात साक्षी-अथर्व यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत ‘3 Days To Go’ असा संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी या जोडीने लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.

साक्षी महाजन ही स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि सेटवर कलाकारांनी तिचं खास केळवण साजरं केलं. दरम्यान, साक्षीने गेल्या वर्षी एका मुलाखतीत २०२६ मध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी अथर्वसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची घोषणा केली आणि दोघांनी युनिक हॅशटॅग #साAThदेखील तयार केला आहे.साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांच्या लग्नाला चाहत्यांकडूनही मोठ्या उत्सुकतेने अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

9 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

10 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

12 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago