मुख्य बातम्या

रांजणगाव-कारेगाव गटात कमळाचा झंझावात; घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुकाच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘कमळ’ वादळासारखे फुलले, तर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळाची टिकटिक मतदारांनी थेट बंद केली आहे’. हा निकाल म्हणजे केवळ पराभव नाही, तर राष्ट्रवादीच्या अहंकाराला बसलेली जबरदस्त चपराक असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

या गटात राष्ट्रवादीची मक्तेदारी होती. मात्र प्रत्यक्षात ही मक्तेदारी पक्षाअंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायामुळे संपुष्टात आली. “सत्ता आमचीच” या भ्रमात राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना यावेळी जनतेने जागा दाखवून दिली असल्याचे बोलले जात आहे. या गटात एकाच घरातील दोन चुलत जावा जिल्हा परिषदसाठी एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या. त्यामुळे प्रचारादरम्यान सोशल मिडीयावर दोन्ही बाजुने प्रचंड मोठया प्रमाणात एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टिका करण्यात आली.

राष्ट्रवादी पक्षाकडुन जिल्हा परिषदसाठी ज्योती पाचुंदकर तर दोन पंचायत समिती गणासाठी महेश फंड आणि कारेगावच्या सरपंच निर्मला नवले या उभ्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाकडुन जिल्हा परिषदसाठी स्वाती पाचुंदकर तर दोन पंचायत समिती गणासाठी सागर देवकर आणि माजी पंचायत समिती सदस्या मनिषा पाचंगे या उभ्या होत्या.

परंतु जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्याच नाराज कार्यकर्त्यांची फौज, कारेगावच्या सरपंच पदाच्या वादामुळे स्थानिक पातळीवर झालेली बंडखोरी आणि मतदारांचा संताप या सगळ्याचा स्फोट मतदानातून झाला. त्यामुळे भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले. हा निकाल जाहीर होताच परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आनंदोत्सव साजरा केला.

एकीकडे “रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला सुरुंग लावला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा पराभव म्हणजे धोक्याची घंटा आहे. रांजणगाव-कारेगाव गटातील हा निकाल म्हणजे भाजपच्या राजकीय वर्चस्वाची नांदी आणि राष्ट्रवादीच्या अस्ताची हि सुरुवात असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

16 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

16 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

16 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

16 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

16 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

16 तास ago