ashok-bhorde
शिरुर (तेजस फडके) उपविभागीय अधिकारी पुणे यांनी पाच तलाठ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या होत्या. त्याबाबत यापूर्वी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी उपोषणही केले होते. परंतु त्यावर अंतिम कार्यवाही न झाल्यामुळे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी पुणे स्नेहा किसवे-देवकाते अखेर नरमल्या आणि शिरुर तालुक्यातील पाच तलाठ्यांना पदभार काढुन घेत त्यांना तालुक्याबाहेर अकार्यकारी पदावर सेवावर्ग करण्यात आले.
शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी तलाठी सजेतील तलाठी सचिन काळेल यांची संजय गांधी योजना पुणे शहर येथे सेवावर्ग केली. टाकळी हाजी सजेतील तलाठी ज्ञानेश्वर चौधरी यांची तहसिल पुणे शहर येथे सेवावर्ग केली. करडे सजेतील तलाठी आर पी जाधव यांची उपविभागीय अधिकारी पुणे येथील कार्यालयात सेवा वर्ग केली. कोरेगाव भिमा सजेतील तलाठी विशाल काळे यांची उपविभागीय अधिकारी पुणे कार्यालयात सेवावर्ग केली. याबाबतचे लेखी पत्र आज दि 1 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी सुट्टी असतानाही उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी काढले.
सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आत्मदहन आंदोलनाच्या पवित्र्यामुळे उपविभागीय अधिकारी पुणे यांनी नरमाईची भुमिका घेत रविवारी सुट्टीच्या दिवशी शिरुर तालुक्यातील तलाठ्यांच्या सजेचा पदभार काढुन घेत तालुक्याच्या बाहेर सेवावर्ग केल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असुन यानंतर महसूल मधील कोणता मासा भोरडे यांच्या गळाला लागणार…? याची शिरुर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा चालु असुन राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन भोरडे यांनी शिरुर तसेच पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात आगळेवेगळे स्वच्छता अभियान राबवले असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्यावर सर्वसामान्य लोकांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…