मुख्य बातम्या

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असुन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यातच शिरुर मतदार संघातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असुन सन २००९ पासुन वळसे पाटील या भागातले आमदार असुनही गेल्या १५ वर्षात यावर काहीच तोडगा न निघाल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहेत.

सन २००९ मध्ये शिरुर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव तालुक्याला जोडली गेली. त्यानंतर सलग १५ वर्षे शिरुर तालुक्यातील ३९ गावच्या सर्वसामान्य मतदारांनी दिलीप वळसे पाटील यांना सलग तीन वेळा विधानसभेत पाठवलं. परंतु पाबळ, केंदुर, कान्हूर मेसाई सह १२ गावचा पाणीप्रश्न मात्र ‘जैसे थे’ च राहिला. त्यामुळे या १२ गावच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असुन त्या नाराजीचा फटका या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना बसण्याची शक्यता असल्याची सध्या ४२ गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

याबाबत पाबळ येथील अनेक शेतकऱ्यांशी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधिने संपर्क साधला असता. गेली १५ वर्षे दिलीप वळसे पाटील यांना ४२ गावातुन आम्ही विधानसभेवर पाठवले तसेच वळसे पाटील हे गेली २८ वर्षे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री झाले आहेत. परंतु आमच्या १२ गावच्या पाण्याचा प्रश्न अजुनही जसाच्या तसाच आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व १२ गावचे शेतकरी वेगळी भुमिका घेणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

Loading ...

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

4 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

9 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

9 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

9 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

9 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

11 तास ago