मुख्य बातम्या

महाराष्ट्र बँकेची ९ महीन्यातच शेतकऱ्यांकडून नियमबाहय पिककर्ज वसुली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेकडून ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याचा आरोप होत असतानाच येथील नियमित कर्जदार खातेदारांना चक्क 9 महिन्यातच नुतनीकरण करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने सदर शेतकरी खातेदारांना धक्का बसला आहे.

एका नियमित पीककर्ज खातेदाराची मुदत जुलै महिन्यात संपत असूनही त्यास नोटीस आल्याने त्यांनी बँकेत जावून चौकशी केली असता बँकेतील शाखा अधिकाऱ्यांनी तुम्हाला जर अनुदान मिळवायचे असेल तर आताच नुतनीकरण करून घ्या, असा सल्ला देत त्यांना किती रकमेचा भरणा करावा लागेल हेही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले. त्यामुळे अचानक आलेल्या नोटीस ने काहीही मनी ध्यानी नसताना ऐन मार्च अखेरीस मार्च एंड साठी केवळ दोनच दिवस शिल्लक असताना भरणा करण्यास सांगितल्याने ही रक्कम अचानक कशी उभी करायची या विचाराने त्या ग्राहकास प्रचंड मानसिक ताण वाढल्याने त्याचा बी पी वाढला गेला असून त्याला दवाखान्यात अडमिट होण्याची वेळ आली आहे.

बँकेतील शाखाधिकारी ग्राहकांशी संवाद साधताना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. माझी या ठिकाणी फक्त वसुलीसाठी नियुक्ती झाली आहे, असे बोलत नवीन कर्ज घेणाऱ्यांना अधिकारी सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याने नवीन कर्ज प्रकरणाबाबत अनेक हेलपाटे मारूनही अनेकांना दुसऱ्या बँकेचा दरवाजा ठोठावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थ बँकेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करणार असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.

पीककर्ज घेणारा शेतकरी नियमित असतानाही आणि त्याच्या कर्जाची मुदत संपण्याच्या आधीच 3 महिने वसुलीसाठी नोटीस पाठवून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जात आहे. याचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. याचा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला जाईल, असे शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

33 मिनिटे ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

36 मिनिटे ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

4 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

4 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

4 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

4 तास ago