शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेकडून ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याचा आरोप होत असतानाच येथील नियमित कर्जदार खातेदारांना चक्क 9 महिन्यातच नुतनीकरण करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने सदर शेतकरी खातेदारांना धक्का बसला आहे.
एका नियमित पीककर्ज खातेदाराची मुदत जुलै महिन्यात संपत असूनही त्यास नोटीस आल्याने त्यांनी बँकेत जावून चौकशी केली असता बँकेतील शाखा अधिकाऱ्यांनी तुम्हाला जर अनुदान मिळवायचे असेल तर आताच नुतनीकरण करून घ्या, असा सल्ला देत त्यांना किती रकमेचा भरणा करावा लागेल हेही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले. त्यामुळे अचानक आलेल्या नोटीस ने काहीही मनी ध्यानी नसताना ऐन मार्च अखेरीस मार्च एंड साठी केवळ दोनच दिवस शिल्लक असताना भरणा करण्यास सांगितल्याने ही रक्कम अचानक कशी उभी करायची या विचाराने त्या ग्राहकास प्रचंड मानसिक ताण वाढल्याने त्याचा बी पी वाढला गेला असून त्याला दवाखान्यात अडमिट होण्याची वेळ आली आहे.
बँकेतील शाखाधिकारी ग्राहकांशी संवाद साधताना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. माझी या ठिकाणी फक्त वसुलीसाठी नियुक्ती झाली आहे, असे बोलत नवीन कर्ज घेणाऱ्यांना अधिकारी सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याने नवीन कर्ज प्रकरणाबाबत अनेक हेलपाटे मारूनही अनेकांना दुसऱ्या बँकेचा दरवाजा ठोठावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थ बँकेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करणार असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.
पीककर्ज घेणारा शेतकरी नियमित असतानाही आणि त्याच्या कर्जाची मुदत संपण्याच्या आधीच 3 महिने वसुलीसाठी नोटीस पाठवून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जात आहे. याचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. याचा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला जाईल, असे शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे यांनी सांगितले.
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…
शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…