मुख्य बातम्या

सरपंचांनी सोडवला पन्नास वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न

बुरुंजवाडीत सरपंच नानासाहेब रुके व डॉ. रवींद्र टेमगिरेंकडून जागा

शिक्रापूर (शेरखान शेख): बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना 50 वर्षापासून नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना सरपंच नानासाहेब रुके, मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे या चौघांनी 20 गुंठे जमीन विकत घेत ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी देऊ केली असल्याने गावातील 50 वर्षापासून प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न आता संपणार आहे.

बुरुंजवाडी (ता. शिरुर) गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन होऊन सत्तेचाळीस वर्षे झाले असून ग्रामपंचायत स्थापनेच्या पूर्वीपासून गावाला नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक स्मशानभूमी उपलब्ध नव्हती तर स्मशानभूमी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने यापूर्वी गावाला स्मशानभूमीसाठी जागा दान करण्याचा शब्द सरपंच नानासाहेब रुकेव डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी दिला असता नुकतेच सरपंच नानासाहेब रुके, किसान संघाचे अध्यक्ष मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे डॉ. रवींद्र टेमगिरे, चेअरमन विजय टेमगिरे यांनी वीस गुंठे जागा विकत घेऊन ग्रामपंचायतला बक्षीस पत्र देऊ केली आहे.

सरपंच नानासाहेब रुके यांनी जनसेवा योजनेच्या माध्यमातून नवीन स्मशानभूमी बांधकामसाठी 1 लाख निधी मंजूर करुन घेतल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे तर गावातील इतर विकासकामे देखील जलद गतीने मार्गी लावणार असल्याचे संरपच नानासाहेब रुके, उपसरपंच अश्विनी नळकांडे, चेअरमन विजय टेमगिरे, माजी सरपंच विलास नळकांडे, सुशिलकुमार रुके, धनंजय रुके, शरद टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्या कावेरी नळकांडे, पूनम रुके यांनी सांगितले. तर गावातील पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांसह ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago