बुरुंजवाडीत सरपंच नानासाहेब रुके व डॉ. रवींद्र टेमगिरेंकडून जागा
शिक्रापूर (शेरखान शेख): बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना 50 वर्षापासून नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना सरपंच नानासाहेब रुके, मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे या चौघांनी 20 गुंठे जमीन विकत घेत ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी देऊ केली असल्याने गावातील 50 वर्षापासून प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न आता संपणार आहे.
बुरुंजवाडी (ता. शिरुर) गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन होऊन सत्तेचाळीस वर्षे झाले असून ग्रामपंचायत स्थापनेच्या पूर्वीपासून गावाला नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक स्मशानभूमी उपलब्ध नव्हती तर स्मशानभूमी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने यापूर्वी गावाला स्मशानभूमीसाठी जागा दान करण्याचा शब्द सरपंच नानासाहेब रुकेव डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी दिला असता नुकतेच सरपंच नानासाहेब रुके, किसान संघाचे अध्यक्ष मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे डॉ. रवींद्र टेमगिरे, चेअरमन विजय टेमगिरे यांनी वीस गुंठे जागा विकत घेऊन ग्रामपंचायतला बक्षीस पत्र देऊ केली आहे.
सरपंच नानासाहेब रुके यांनी जनसेवा योजनेच्या माध्यमातून नवीन स्मशानभूमी बांधकामसाठी 1 लाख निधी मंजूर करुन घेतल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे तर गावातील इतर विकासकामे देखील जलद गतीने मार्गी लावणार असल्याचे संरपच नानासाहेब रुके, उपसरपंच अश्विनी नळकांडे, चेअरमन विजय टेमगिरे, माजी सरपंच विलास नळकांडे, सुशिलकुमार रुके, धनंजय रुके, शरद टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्या कावेरी नळकांडे, पूनम रुके यांनी सांगितले. तर गावातील पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांसह ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…