शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ येणार असल्याची गोपनीय माहिती वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली होती. पुणे- नगर हायवेवर शिक्रापुर येथे वाहतूक शाखेचे कर्तव्य तत्परतेने काम करणारे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी ही बाब तात्काळ वरिष्ठांना सांगून सापळा रचून ५३ किलो गांजासह दोन स्कार्पिओ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
शिक्रापुर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी तब्बल ५३ किलो गांजा सह एक स्कॉर्पिओ गाडी वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.
शिक्रापुर (ता.शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे-नगर महामार्गावरुन दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधुन काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर-पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये १९ लाख ६० हजार ७४० रुपयांचा ५३ किलो गांजा असल्याचे दिसून आले.
दरम्यान पोलिसांच्या पथकाने दोन्ही स्कॉर्पिओ सह त्यामध्ये असलेला तब्बल ५३ किलो गांजा जप्त करत गांजा वाहतूक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे रा. हासनपूर ता. शेवगाव जि. अहिल्यानगर, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर (वय २२) व हर्षद देविदास खेडकर (वय २०) दोघे रा. एकनाथवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर, शुभम बंडू जवरे (वय २१) व तुषार रामनाथ जवरे वय (वय २१) दोघे रा. वाडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर, अक्षय कांतीलाल आव्हाड (वय २६) रा. करमाळा रोड राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. या कामगिरीमुळे पोलीस हवालदार मिलिंद देवरे तसेच शिक्रापुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी
‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट
शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…