Shikrapur Police Station
शिरूर: शिरूर तालुक्यातील वाडागाव येथील तीन लहान चिमुकल्यांचे एका युवकाने अपहरण करुन एका चिमुकलीला विहिरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे.
गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७ रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. झारखंड) असे खून केलेल्या चिमुकलीचे नाव असून, तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. पोलिसांनी बबन रामपीर यादव (वय ४२ रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे.
वाडागाव यथील गायत्री, कार्तिक रविदास आणि अभिजित पासवान (दोघे वय तीन वर्षे) ही चिमुकली शनिवारी (ता. २२) बेपत्ता झाले होते. याबाबत विनादेवी रणजीतकुमार रविदास या महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पो. नि. दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. अविनाश शिळीमकर, पो. उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहाय्यक उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पो. हवा. आत्माराम तळोले, रोहिदास पारखे, नवनाथ नाईकडे, किशोर तेलंग, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल दांडगे, औदुंबर वाघमारे, ललित चक्रनारायण आदींनी बालकांचा शोध सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बबन यादव हा दुचाकीहून तिघा बालकांना घेऊन गेल्याचे समोर आले.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात थेट खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव गाठले. त्यांनतर सदर ठिकाणहून बहुल गावातून बबन हा तिघांपैकी दोघा बालकांना पुन्हा शिक्रापूर दिशेने येताना दिसला. पोलिसांना त्यांनतर काही वेळात दोन बालके रस्त्यावर मिळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत बबनचा शोध घेतला असता रात्रीच्या सुमारास पोलिसांनी बबन यादव याला ताब्यात घेतले असता बहुळ गावातील एका विहिरीमध्ये गायत्रीला टाकून दिल्याचे सांगितले.
शिक्रापूर, शिरुर, रांजणगाव पोलिस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सदर ठिकाणी शोध घेतला. दरम्यान पुणे महानगर प्रादेशिक परिवहन विभागाचे अग्निशमन अधिकारी प्रकाश मदने, महेश पाटील, प्रशांत अडसूळ, उमेश फाळके, अल्ताफ पटेल, आपदा मित्र वैभव निकाळजे, राहुल काटे, राज जावळे, प्रेम निकाळजे, रोहित शिंदे, निखिल काळे, राहुल गायकवाड, यश शिंदे, राहुल पवळे आदींनी सदर विहिरीमध्ये शोध घेतला असता गायत्रीचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करत आहेत.
दरम्यान, वाडागाव येथून अपहरण झालेली तिनही बालकांचे कुटुंबीय व आरोपी हे परप्रांतिय असून मृत गायत्रीच्या मावशी बरोबर आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तिनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहीरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात बापानेच केला मुलीचा खून…
शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…