मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान पंचनामा आणि ऑनलाइन पीक पाहणी करण्यासाठी तलाठी गावात येण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. संबंधित तलाठी गावात न येता उलट मोबाईलवरून शेतकऱ्यांशी आरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार वाघाळे (ता. शिरूर) गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘पावसामुळे आमचे पीक वाया गेले, तरी सरकारी मदतीसाठी कोणी येत नाही. वाघाळे गावासाठी दिलेला तलाठी गावात आल्याचे कोणाला आठवतही नाही. तलाठी यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उद्धटपणे उत्तर मिळतात. मी रजेवर आहे. तुम्हाला आत्ता जाग आली का? मुदत संपत आली आहे, वरती विचारणा करा, अशी त्यांची आरेरावीची भाषा असून, शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे वाघाळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वाघाळे गावामध्ये तलाठी जर येतच नसेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जायचे कोणाकडे? मोबाईलवर संपर्क साधला की अरेरावीची भाषा केली जाते. वाघाळे गावामध्ये एक खासगी व्यक्तीची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत संबंधित तलाठी कामे करून घेत आहे. परंतु, खासगी व्यक्तीला यंत्रणेची पूर्ण माहिती नसल्यामुळे पंचनामा करण्यात अडचणी येत आहेत. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही दिवसरात्र मेहनत घेतो, पण अधिकारी गावात येऊन परिस्थितीची पाहणी करायला तयार नाहीत. नुकसान झाले तरी आम्हालाच दोष दिला जातो.” संबंधित तलाठी यांना वरिष्ठ पाठीशी घालत असल्यामुळेच त्यांची अरेरावीची भाषा आहे. संबंधितावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अर्ज प्राधान्याने निकाली काढावेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले

शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल; डॉ. नीलम गोऱ्हे

Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

5 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

5 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

6 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

11 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

11 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

11 तास ago