मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान पंचनामा आणि ऑनलाइन पीक पाहणी करण्यासाठी तलाठी गावात येण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. संबंधित तलाठी गावात न येता उलट मोबाईलवरून शेतकऱ्यांशी आरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार वाघाळे (ता. शिरूर) गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘पावसामुळे आमचे पीक वाया गेले, तरी सरकारी मदतीसाठी कोणी येत नाही. वाघाळे गावासाठी दिलेला तलाठी गावात आल्याचे कोणाला आठवतही नाही. तलाठी यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उद्धटपणे उत्तर मिळतात. मी रजेवर आहे. तुम्हाला आत्ता जाग आली का? मुदत संपत आली आहे, वरती विचारणा करा, अशी त्यांची आरेरावीची भाषा असून, शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे वाघाळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वाघाळे गावामध्ये तलाठी जर येतच नसेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जायचे कोणाकडे? मोबाईलवर संपर्क साधला की अरेरावीची भाषा केली जाते. वाघाळे गावामध्ये एक खासगी व्यक्तीची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत संबंधित तलाठी कामे करून घेत आहे. परंतु, खासगी व्यक्तीला यंत्रणेची पूर्ण माहिती नसल्यामुळे पंचनामा करण्यात अडचणी येत आहेत. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही दिवसरात्र मेहनत घेतो, पण अधिकारी गावात येऊन परिस्थितीची पाहणी करायला तयार नाहीत. नुकसान झाले तरी आम्हालाच दोष दिला जातो.” संबंधित तलाठी यांना वरिष्ठ पाठीशी घालत असल्यामुळेच त्यांची अरेरावीची भाषा आहे. संबंधितावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अर्ज प्राधान्याने निकाली काढावेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले

शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल; डॉ. नीलम गोऱ्हे

Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

9 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

11 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

16 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

16 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

16 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

16 तास ago