आरोग्य

उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ नियम

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज आहे. स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण फ्रीजचा वापर करतो.पण अनेकदा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ते टिकून राहण्याऐवजी खराब होतात. शिजवलेले अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. यामध्ये पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. पण अन्नपदार्थ ठेवताना आपण काळजी घ्यायला हवी.

अनेकदा आपण जेवण बनवण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी आधीच करतो. ज्यामुळे पीठ किंवा इतर साहित्य आधीच तयार करुन फ्रीजमध्ये ठेवतो. उरलेले अन्न किंवा शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढतात आणि खराब होण्याची शक्यता वाढते असं म्हटलं जातं. पण खरेतर हे चूक आहे. आपण हे अन्नपदार्थ कसे साठवून ठेवतो यावर सगळं काही अवलंबून असते.

1) जेव्हा आपण अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ०-४°C ठेवतो तेव्हा बॅक्टेरियाची वाढ मंदावते. ते बॅक्टेरिया मारत नाही. ज्यामुळे अन्न काहीवेळासाठी चांगले राहते. इतकेच नाही तर फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने त्यातील पोषकतत्व मरत नाही. पोषणतज्ज्ञ म्हणतात अनेकदा स्वयंपाक करताना पदार्थातील पोषणतत्व संपतात. त्यासाठी अन्नपदार्थ शिजवल्यानंतर ते योग्यरित्या थंड केल्यानंतर साठवायला हवे. ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी चविष्ट आणि पौष्टिक राहू शकते.

2) अनेकदा घरातील मंडळी जेवल्यानंतर आपण पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. पण शिजवलेले पदार्थ २ तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवायला हवे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा देखील समावेश आहे. यात बॅक्टेरियाचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. याशिवाय अन्न गरम केले असेल तर सरळ फ्रीजमध्ये ठेवू नका. ते थंड होऊ द्या, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. तापमानात बदल झाल्यानंतर अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. यामुळे पदार्थ वाया जाणार नाहीत.

 

 

3) पदार्थ आपल्याला फ्रीजमध्ये साठवायचे असतील तर त्यासाठी स्वच्छ आणि हवाबंद डब्यांचा वापर करा. अन्न उघड्या प्लेटमध्ये किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवल्यास लवकर खराब होते. इतकेच नाही तर त्याचा वास संपूर्ण फ्रीजमध्ये पसरतो.

4) वारंवार अन्नपदार्थ गरम करत असाल तर ते टाळा. अन्न वारंवार गरम केल्याने पोषण कमी होते. आणि ते खराब होण्याचा धोका वाढतो. म्हणून एकदाच गरम करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

2 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

2 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

2 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

2 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

2 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

2 तास ago