आरोग्य

उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ नियम

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज आहे. स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण फ्रीजचा वापर करतो.पण अनेकदा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ते टिकून राहण्याऐवजी खराब होतात. शिजवलेले अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. यामध्ये पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. पण अन्नपदार्थ ठेवताना आपण काळजी घ्यायला हवी.

अनेकदा आपण जेवण बनवण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी आधीच करतो. ज्यामुळे पीठ किंवा इतर साहित्य आधीच तयार करुन फ्रीजमध्ये ठेवतो. उरलेले अन्न किंवा शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढतात आणि खराब होण्याची शक्यता वाढते असं म्हटलं जातं. पण खरेतर हे चूक आहे. आपण हे अन्नपदार्थ कसे साठवून ठेवतो यावर सगळं काही अवलंबून असते.

1) जेव्हा आपण अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ०-४°C ठेवतो तेव्हा बॅक्टेरियाची वाढ मंदावते. ते बॅक्टेरिया मारत नाही. ज्यामुळे अन्न काहीवेळासाठी चांगले राहते. इतकेच नाही तर फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने त्यातील पोषकतत्व मरत नाही. पोषणतज्ज्ञ म्हणतात अनेकदा स्वयंपाक करताना पदार्थातील पोषणतत्व संपतात. त्यासाठी अन्नपदार्थ शिजवल्यानंतर ते योग्यरित्या थंड केल्यानंतर साठवायला हवे. ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी चविष्ट आणि पौष्टिक राहू शकते.

2) अनेकदा घरातील मंडळी जेवल्यानंतर आपण पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. पण शिजवलेले पदार्थ २ तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवायला हवे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा देखील समावेश आहे. यात बॅक्टेरियाचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. याशिवाय अन्न गरम केले असेल तर सरळ फ्रीजमध्ये ठेवू नका. ते थंड होऊ द्या, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. तापमानात बदल झाल्यानंतर अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. यामुळे पदार्थ वाया जाणार नाहीत.

 

 

3) पदार्थ आपल्याला फ्रीजमध्ये साठवायचे असतील तर त्यासाठी स्वच्छ आणि हवाबंद डब्यांचा वापर करा. अन्न उघड्या प्लेटमध्ये किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवल्यास लवकर खराब होते. इतकेच नाही तर त्याचा वास संपूर्ण फ्रीजमध्ये पसरतो.

4) वारंवार अन्नपदार्थ गरम करत असाल तर ते टाळा. अन्न वारंवार गरम केल्याने पोषण कमी होते. आणि ते खराब होण्याचा धोका वाढतो. म्हणून एकदाच गरम करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

5 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

5 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

5 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

9 तास ago