आरोग्य

रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

लोक अनेकदा उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथीच्या बियांचं पाणी पितात. पण अनेक लोकांच्या मनात असाही प्रश्न पडतो की, उपाशीपोटी आंबट फळांचे ज्यूस प्यावे की नाही? यावर अनेक एक्सपर्ट सांगतात की, संत्री, आवळा, मोसंबीचा ज्यूस उपाशीपोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतात. कारण या फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे पोटासाठी योग्य नाही. अशात सकाळी उपाशीपोटी आंबट फळांचा ज्यूस पिऊन कोणत्या समस्या होतात हे पाहुयात.

आंबट फळांचा ज्यूस पिण्याचे नुकसान

छातीत जळजळ आणि अ‍ॅसिडिटी

लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी फळं अ‍ॅसिडी क असतात. जेव्हा आपण उपाशीपोटी यांचा ज्यूस पितो, तेव्हा पोटात अ‍ॅसिडचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते.

गॅस्ट्रायटिसचा धोका

पोटात अ‍ॅसिडिटी वाढल्यानं पोटाच्या आतील थरात जळजळ होऊ शकते. जर ही समस्या जास्त दिसत राहत असेल तर गॅस्ट्रायटिसची समस्या होऊ शकते. खासकरून अशा लोकांना ज्यांना आधीच पोटासंबंधी समस्या असतात.

ब्लड शुगर वाढते

भलेही या ज्यूसमध्ये वरून साखर टाकलेली नसेल तरीही नॅचरल शुगर असतेच. त्यामुळे उपाशीपोटी जर हे ज्यूस प्याल तर अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. ज्यानंतर थकवा आणि कमजोरी जाणवते.

दातांचं नुकसान

आंबट फळांमधील अ‍ॅसिडनं दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. दात कमजोर होतात. तसेच दातांना किड लागण्याचा आणि झिणझिण्या येण्याचा धोका असतो.

उपाशीपोटी काय फायदेशीर

जर आपल्याला आंबट फळांचा ज्यूस प्यायचा असेल तर जेवणासोबत किंवा जेवणानंतर प्यावा. असं केल्यानं पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण कमी होतं आणि जळजळ होण्याचा धोकाही कमी होतो. उपाशीपोटी आपण कोमट पाणी किंवा लिंबू पाणी (लिंबाचा रस कमी टाकलेलं) पिऊ शकतात. यानं शरीर हायड्रेट राहतं आणि डिटॉक्सही होतं. ज्या लोकांना गॅस्ट्रायटिस किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्ससारखी समस्या असेल तर त्यांनी सकाळी उपाशीपोटी आंबट फळं किंवा त्यांचा ज्यूस पिणं टाळलं पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

14 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

20 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

20 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

20 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

20 तास ago