आरोग्य

रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

लोक अनेकदा उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथीच्या बियांचं पाणी पितात. पण अनेक लोकांच्या मनात असाही प्रश्न पडतो की, उपाशीपोटी आंबट फळांचे ज्यूस प्यावे की नाही? यावर अनेक एक्सपर्ट सांगतात की, संत्री, आवळा, मोसंबीचा ज्यूस उपाशीपोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतात. कारण या फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे पोटासाठी योग्य नाही. अशात सकाळी उपाशीपोटी आंबट फळांचा ज्यूस पिऊन कोणत्या समस्या होतात हे पाहुयात.

आंबट फळांचा ज्यूस पिण्याचे नुकसान

छातीत जळजळ आणि अ‍ॅसिडिटी

लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी फळं अ‍ॅसिडी क असतात. जेव्हा आपण उपाशीपोटी यांचा ज्यूस पितो, तेव्हा पोटात अ‍ॅसिडचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते.

गॅस्ट्रायटिसचा धोका

पोटात अ‍ॅसिडिटी वाढल्यानं पोटाच्या आतील थरात जळजळ होऊ शकते. जर ही समस्या जास्त दिसत राहत असेल तर गॅस्ट्रायटिसची समस्या होऊ शकते. खासकरून अशा लोकांना ज्यांना आधीच पोटासंबंधी समस्या असतात.

ब्लड शुगर वाढते

भलेही या ज्यूसमध्ये वरून साखर टाकलेली नसेल तरीही नॅचरल शुगर असतेच. त्यामुळे उपाशीपोटी जर हे ज्यूस प्याल तर अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. ज्यानंतर थकवा आणि कमजोरी जाणवते.

दातांचं नुकसान

आंबट फळांमधील अ‍ॅसिडनं दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. दात कमजोर होतात. तसेच दातांना किड लागण्याचा आणि झिणझिण्या येण्याचा धोका असतो.

उपाशीपोटी काय फायदेशीर

जर आपल्याला आंबट फळांचा ज्यूस प्यायचा असेल तर जेवणासोबत किंवा जेवणानंतर प्यावा. असं केल्यानं पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण कमी होतं आणि जळजळ होण्याचा धोकाही कमी होतो. उपाशीपोटी आपण कोमट पाणी किंवा लिंबू पाणी (लिंबाचा रस कमी टाकलेलं) पिऊ शकतात. यानं शरीर हायड्रेट राहतं आणि डिटॉक्सही होतं. ज्या लोकांना गॅस्ट्रायटिस किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्ससारखी समस्या असेल तर त्यांनी सकाळी उपाशीपोटी आंबट फळं किंवा त्यांचा ज्यूस पिणं टाळलं पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

2 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

8 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

8 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

8 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

8 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago