जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. पानात मधुमेह विरोधी, हृदय व रक्तवाहिन्या संबंधी, दाहक विरोधी, व्रण विरोधी आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात १.३ मायक्रोग्रॅम आयोडीन, ४.६ मायक्रोग्रॅम पोटॅशियम, १.९ मोल्स किंवा २.९ एमसीजी व्हिटॅमिन-ए, १३ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी-1 आणि ०.६३ ते ०.८९ मायक्रोग्राम निकोटीनिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम असते. सुपारीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात, याबाबत माहिती जाणून घेऊया.
बद्धकोष्ठतेवर उपाय
अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, व पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान उपयुक्त उपाय म्हणून मानला जातो. सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी उठल्या नंतर हे पाणी गाळून प्या.
श्वासाची दुर्गंधी व दातांचा पिवळेपणा
सुपारीच्या पानात अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणा नंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.
श्वसन प्रणालीसाठी
खोकला, ब्राँकायटिस, दमा यांसारख्या श्वसन विषयक आजारांवर सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानात आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.
मधुमेह नियंत्रित करते
सुपारीच्या पानात अँटी हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात, जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. सुपारीची पाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्या पासून रोखतात. टाईप २ मधुमेह असलेल्यांना सकाळी रिकाम्या पोटी पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…
मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…
मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…
मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…
मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…