आरोग्य

ज्वारी खाण्याचे फायदे

1) ज्वारीमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जेवणात ज्वारी असल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

2) ऍनिमियामध्ये ज्वारीचा उपयोग होतो. ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लाल पेशींची वाढ होते. अशा व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

3) ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट भरते. शरीरास ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयविकार वाढले आहेत. यासाठी आहारात रोज ज्वारी असावी.

४) ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्स असतात, फायबर्स असतात. यामधून शरीरास प्रोटीन्स मिळतात. फायबर्समुळे अन्नाचे पचन सहजतेने होते. आजारी व्यक्तीस दूध भाकरी द्यावी.

५) ज्वारीमुळे पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण ज्वारीमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात. अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खावी. ज्वारीमुळे मुळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो.

६) ज्वारी पचायला हलकी असल्याने काविळीमध्ये उपयोगी ठरते. काविळ झाल्यावर व नंतर वर्षभर ज्वारीची भाकरी खावी. लिव्हरसाठी उपयुक्त ठरेल.

७) कॉलेस्ट्रॉल वाढले तर आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

८) सध्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या जीवनामुळे महिलांमध्ये विविध समस्या दिसतात. यामध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या दिसून येत आहेत. गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार यासाठी ज्वारी उपयोगी आहे.

९) ज्वारीत कर्करोगावर नियंत्रण ठेवणारे काही घटक असतात. त्यामुळे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ज्वारीचा उपयोग होऊ शकतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

2 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

2 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

2 तास ago

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…

2 तास ago

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…

3 तास ago

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…

3 तास ago