आरोग्य

मधुमेहींनो, काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का

काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजू खाण्याचे अनेक फायदे असले तरी काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का? आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काजू खावेत का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आणि ग्लायसेमिक इंडेक्स (GI)

७५ ग्रॅम काजूमध्ये अंदाजे २० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यापैकी तीन ग्रॅम आहारातील फायबर असतात, म्हणजे फक्त कार्बोहायड्रेटचे प्रमाण १७ ग्रॅम असते.

७५ ग्रॅम काजूचे कॅलरीफिक मूल्य ४४० कॅलरी असते. याचा अर्थ असा की, कार्बोहायड्रेट्सचा कॅलरीवर परिणाम होत नाही; ज्यामुळे ब्रेड, पास्ता इत्यादी अतिकार्बोहायड्रेट पदार्थांच्या तुलनेत काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा मध्यम प्रमाणात वाढते.

“याशिवाय, काजूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ७५ ग्रॅम काजूमध्ये २२ ग्लायसेमिक इंडेक्स असतो. कमी कार्बोहायड्रेट्समुळे काजू कमी ग्लायसेमिक लोड (GL) मध्ये येतो.

कमी GI आणि GL ग्लायसेमिक नियंत्रणाच्या बाबतीत मधुमेहींसाठी एक चांगला पर्याय बनतात.

अतिप्रमाणात प्रोटिन आणि फॅट्स

काजूमध्ये प्रोटिन आणि फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. ७५ ग्रॅम काजूमध्ये १४ ग्रॅम प्रोटिन आणि ३४ ग्रॅम फॅट्स असतात. “हे पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे, कारण पचनक्रिया मंदावते आणि जास्त प्रमाणात पोट भरल्यासारखे वाटते. फॅट्सच्या प्रमाणात ओलेइक अॅसिडचे (oleic acid) प्रमाण जास्त असते. तसेच कार्बोहायड्रेट-टू-फॅट प्रमाण कमी असल्याने मधुमेहींमध्ये चयापचय नियंत्रणासाठी हा एक उत्तम पर्याय बनतो.

मॅग्नेशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते.

काजूमधील मॅग्नेशियम ग्लुकोज चयापचय आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हीटीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. “रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी मॅग्नेशियम शरीराच्या पेशींना इन्सुलिन हार्मोनचा चांगला वापर करण्यास मदत करतो.

मधुमेहींसाठी ते आवश्यक आहे का

जरी काजूची एक वाटी रक्तातील साखरेची पातळी थोडी वाढवत असली तरी मधुमेह असलेल्या लोकांनी ते किती प्रमाणात खावे याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि अति प्रमाणात याचे सेवन करू नये. गोयल सांगतात, “जरी अति प्रमाणात काजूचे सेवन रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत नसले तरी ते कॅलरीज वाढवू शकतात आणि वजनसुद्धा वाढवू शकतात. जर तुम्ही अति प्रमाणात काजूचे सेवन करत असाल तर रक्तातील साखरेची वाढ संतुलित करण्यासाठी फायबरयुक्त किंवा प्रोटिनयुक्त पदार्थांसह काजू खा, जसे की भाज्यांची कोशिंबीर, दही इत्यादी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वेश्यालयात ग्राहक म्हणून गेल्यानेच आरोपी ठरवता येणार नाही; इलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक…

59 मिनिटे ago

चित्रनिर्मितीत AIचा वापर; २५ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा

मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी…

1 तास ago

टेंशनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.…

1 तास ago

खोबरेल तेलात मिसळा ‘हा’ पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे…

1 तास ago

बिबवेवाडीतील जिल्हा परिषदेच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा

मुंबई: पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने उभारण्यासाठी बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्याची…

1 तास ago

धक्कादायक! फीच्या पैशांसाठी विद्यार्थ्यांनीच केली मुख्याध्यापिकेची हत्या; ‘बाबू’ शब्दाने उकलले गूढ

नलगोंडा : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात मुख्याध्यापिकेच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. शाळेतीलच दहावीच्या…

1 तास ago