आरोग्य

सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे ठरू शकते घातक

भारतीयांमध्ये चहा-कॉफीशिवाय सकाळची सुरुवात होत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण बेड टी घेण्याची सवय लावून घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोटाचे तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी दिला आहे.

उपाशीपोटी चहा पिण्याचा ट्रेंड

डॉक्टरांच्या मते भारतात ‘बेड टी’ घेणे हा जणू एक ट्रेंड बनला आहे. मात्र ही सवय तात्काळ बदलण्याची गरज आहे, कारण यामुळे शरीरावर थेट नकारात्मक परिणाम होतात.

अ‍ॅसिडिटीचा धोका वाढतो

उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास पोटातील अ‍ॅसिडिटी वाढते. चहा-कॉफीमध्ये असलेले कॅफीन हे अ‍ॅसिडिक घटक असल्याने पोटात जळजळ, आम्लपित्त आणि गॅसचा त्रास वाढू शकतो. विशेषतः अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी ही सवय टाळावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

आयर्नच्या शोषणावर परिणाम

डॉक्टरांनी सांगितलेले दुसरे कारण अधिक गंभीर आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर शाकाहारी लोकसंख्या असून, अनेकांमध्ये आयर्नची कमतरता आढळते. चहा-कॉफीमधील कॅफीन आयर्नच्या शोषणात अडथळा आणते. नाश्त्यासोबत किंवा उपाशीपोटी चहा घेतल्यास अन्नातील आयर्न शरीरात नीट शोषले जात नाही. परिणामी अ‍ॅनिमियाचा धोका वाढू शकतो.

आयर्न कमी असल्यास दिसणारी लक्षणे

आयर्नची कमतरता असल्यास अशक्तपणा, सतत थकवा, चेहरा व डोळे फिकट दिसणे, धाप लागणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

मग चहा-कॉफी कधी प्यावी?

चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी थोडेसे काहीतरी खावे. त्यानंतर किमान 30 मिनिटांनी चहा किंवा कॉफी घेतल्यास पोटावर आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

8 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

14 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

14 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

14 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

14 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

15 तास ago